महिकावती (माहिम)ची बखर

।। याच देशले ।। रखमाजिराव ।। यांहि गावांचा वसुल करावा ।। यैसें खत दिधलें ।। रखमाजीराव देशला मरोळा स्थापिला ।। या उपर गंगाधरराव मालाडि स्थापिला ॥ दाहा सहश्र सजगाणिस खोति त्यासी दिधली ॥ त्याचे ताबिस गावं कोणकोण ॥ मालाड १ चिचघर २ डिडोसी ३ कुन्हार ४ पाहाड ५ बीलवड ६ वोळणे ७ मालवण ८ कांधवळी ९ सिंपोवली १० येकसर ११ बोरवळी १२ कणेरी १३ माघठाण १४ पोईसर १५ दहिंसापुर १६ नरसापुर १७ फोंजिवरे १८ लाजीवरे १९ अव्हेलि २० केतवली २१ विराळि २२ ऐसें बाविस गावें मालाड खापण्या खालिं ।। गंगाधर या गावांचा देशला ॥ वसुल जमा करावा ॥ ऐसें खत राया हस्तिं साक्षसि दिधलीं ।। या रिती देशले स्थापिले ।। छ ।। या उपरांत सिंधे शेषवंशि खलक पाईक गणति सहश्र ३००० त्या मध्यें मुख्य बाळाजी सिंधा ।। शेषवंशि त्याचे हवालें बंदरकि चौफेर दिधली ।। त्या मध्यें पांच गावं ईनाम ।। वरकड सा हजार सजगाणि राजपैकि मसाला ।। ठीकाण उत्तना।। उत्तन १ गोराई २ मनोरी ३ सावरी ४ वाडा ५ हीं गांवें इनाम ।। ईतर मसाला ।। येरगण आगसं २ पढ ३ बेतावं ४ आंबौलि ५ बाधौलि ६ आंधेरी ७ ईळे ८ पाटळे ९ तुरेर १० खारी ११ दांडे १२ जुहूं १३ कपासे १४ लाजुरलें १५ वसारे १६ डोंगरी १७ यवं गावें स १७।। मसाला ६ सहश्र सजगाणि ।। ऐसें खत रायें सिकाबंद दीधलें ।। बाळाजि सिंध्या कारणे ।। विडा पाटिलिकिचा रायें दिधला ॥ यापरि तो पाटिल सर्व आपले खुमाचा ।। त्याणें उत्तनास चउक बांधिला ॥ त्याचा निजांग पुतण्या तो जुहांस स्थापिला ॥ त्यास हि पाटिलपद जाले ॥ खाशाचा पुतण्या म्हणोन तो हि पद पावला ।। त्याणे जुहांस चउक बांधिला ॥ नावं पोमाळ ठेविलें ॥ त्याचे ताबिस कबिले ५० त्यांहि जुहा घरबंद केला ।। दुराठि वसविली ।। यावत् ताराघर बंद केला ।। या उपरांत सूर्यवंशि गंभिरराव सरिचटणीस गोत्र वशिष्ट ।। कुळदेवता काळिका ।। त्यासि ईनाम वरोळि पद पुरो देवोन आपले खुमासिं स्थापिला ॥ या उपरांत राजा तेथोन प्रभावतिसी आला ॥ दीर्घीपाळिसिं माहाल बांधिले ॥ नावं माहिम ठेविलें ।। राजा माहिमा राहिला ।। संवत्सर ९ माहिमा राज्य केलें ॥ राजपुत्र महिबिंब तो ठाण्यासि राहिला ॥ त्याणे ठाणे बळकावलें ।। समागमि विठोबा सोमवंशि सर फौजदार ।। त्याणे पांच पाखाड्या मसाल्यासिं घेतल्या ।। मसाला महीबिंबासि द्यावा ।। हजार ४ सजगाणि खत घेवोन पांचपाखाडि माहाल बांधोन राहिला । ताबिस राउत ५०० ॥ आाणि सिंधा शेषवंशि धमोंजि आवल्या दळासिं चेंदणिं राहिला ॥ मसाला सहस्त्र ३ ।। चेंदणी १ माघेरी २ टेंभ ३ उतळेश्वर ४ ही चार गावें मसाला कबुल करोन ।। धर्मोजिराव उतळेश्वरि राहिला ।। माहाल बांधिला ॥ पद वरातदार।। या रिती धर्मोजिस वरातदार पद जालें ।। राज्यास वरात मसाला सहश्र ३ सजगाणी ।। या उपरांत कोलभाट वसविली ॥ पाईकाहि ते सोमवंशि ।। त्याहि नांव कोलभाट ठेविलें ॥ तेथे राउत राहिले । त्यो उपरांत सरफोजदाराचा गुमस्ता हरबाजि तोरणा ॥ त्याणे माहाल हवाल्यासिं गावें १३ तेरा कबुल केलीं ।। सरकारजमा सहस्त्र ६ सजगाणि खोति खत घेतलें।। गुदगांव १ व्यांडे २ नाउर ३ भांडुप ४ मुळुंद ५ हरेळि ६ विखरवळि ७ कानझुरें ८ कोंपरें ९ कि-होळ १० तुरभे ११ माडळे १२ मानी १३।। त्याणे आपला समुदाये घेवोन व्याडासी तटाकातिरी गांव रचिला ।। गुदगाव तो हि वसविला ।। या उपरांत सरसबनिसाचा गोत्रज देवनरे ।। तागईत बारा गावें खोति केली ।। बारा सहश्र सजगाणि खत घेतलें ॥ आपण देवन-या राहिला ।। देवनरे । चेभुर २ वाडेवली ३ ह्याउल ४ घांटे ५ कोंपरे ६ चउक ७ चिल्हाणे ८ पारडि ९ बोरलें १० तुरफें ११ कोळगांव १२ हीं बारा गावें गंगाधरराये करोन आपण देवन-या आपल्या समुदायें गावें वसविलीं ।। तो तेथे राहिला ।। या उपरांत राजा माहिमा होउन ॥ आपला कुळकर्णिक त्यास घोडबंदर ईनाम दिधलें ।। तो घोडबंदरा. पाठविला ॥ त्याण्हे नदाथडिचे गावं खोति ४० सहश्र सजगाणि खत घेतलें ।। राजसिका घेवोन घोडबंदरा आला ।। डोंगर चौफेर पाहिला ।। उदक उत्तम जाणोन सेकनाड वसविलें ॥ तेथे शेषवंशि दादराव आपुलें समुदायें स्थापिला ।। आपण घोडबंदर वसविलें ।। ताबिस गावें गणति पाहातां । घोडेबंदर १ बोरभाट २ सेकनाड ३ चेने ४ वडवोळी ५ कावेसर ६ वोंवळे ७ बाळखंभ ८ माझिवडे ९ केबळी १० घोडगांव ११ खराळें १२ कासिमिरे १३ चादवोळ १४ भाईदर १५ गोरदेव १६ पाडेखल १७ सारवडी १८ नवधर १९ रेपवडे २० आगठो २१ माडलि २२ मुडधे २३ मोरवे २५ गोगरी २६ पाल २७ तारवडी २८ पाटालि २९ ह्मारवड ३० राये ३१ हीं गावें येकतिस ॥ तुरफे ३२ कोलसेद ३३ घालोन गावें तेतिस ।। सरसबनिस आनंदराव ।। शेषवंशि ।। गोत्र हरित ।। कुळदेवता हरबाये ।। यांहि मसाला कबुल करोन आपले पैकि सत्तेसि राहिले।। इतक्यांत राजा प्रमादला ॥ रायाचि राणि सती निघाली ॥ मग बिंबदेवाने राज्य केले वरुषे ६५ ।।

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries