नंतर च्यार महिने गुदरून कर्नाटक प्रांती हैदरखानाने बहुत उपद्रव तालुक्यास केला, याजकरितां फौजबंदी करून राजेश्री पांडुरंगराव गोविंद सरकारांतून रवाना केले. ते कुचदरकूच सावनूर तालुक्यापरयंत गेले. सावशनजीक हैदरखानाची फौज आली. पांडुरंगराव यांची फौजेची गांठ पडोन लढाई बिघडून पांडुरंगराव सांपडले. फौज तमाम विस्खळीत होऊन गेली. लुटूनही गेली. खराबी बहुत जाहाली. ऐसे जाणोन, परशरामपंतभाऊ कोलापूर प्रांती फौजसुधां मोकाम होता तेथून कूच करून नोळीचे बारीस येऊन राहिले. फौज विस्खळीत जाहाली होती, ते तमाम जमून एका जागा जमाव करून हैदरखानाच्या फौजेच्या तोंडावर येऊन उतरली इ।। सन मा ता सन ११८७ परयंत राहून थोडाबहुत तालुकियाचा बंदोबस्त करून माघारे देशास आले. येऊन नजीक पुरंदर गडापासी मोकाम केला. ते साल स ११८८ कार्तिक मासपरयंत राहून सुरापूर प्रांतांत जावयाची मोहीम सिध्द करून भाऊ आले. सुरापूर प्रांती जाऊन बेरडाचे पारपत्य करून अखेर साली अकेवाड, कोल्हापूर प्रांताचा गांव होता, त्यास येऊन शाहा देऊन हाला करून अकेवाड सर करून घेतले. पुढे सन ११८९ साली अखेर साली सिरोळ जागा बिगट होती तीही शाहा देऊन सर करून घेतली. ठाणे बैसविले. सन ११९० साली इंग्रज याचा उत्कर्ष बहुत जाहाला. याजकरितां तमाम फौजा सरकारांतून रवाना जाहाल्या. इंग्रजांचे पारपत्य करून यश घेऊन आपले ठिकाणास आले. सन ११९१ साली फौजबंदी मुलुकगिरीची जाहाली नाही. तमाम फौजा घरी राहिल्या. सन ११९२ साली सवाईमाधवराव यांचे लग्न पुणे मुकामी माघ मासी शु पक्षी जाहाले. तमाम सरदार येऊन समारंभ जाहला. निजामअल्लीही स्वारीसुधां समारंभास आले होते. त्या साली मुलुखगिरी जाहली नाही. सन ११९३ साली अखेरीस निजामअल्ली याची व श्रीमंताची फौजबंदी झाली. नाना फडणीस यांनी स्वारी तयारी करून यादवगिरीचे स्थळी उभयपक्षी भेटी जाहाल्या. ते साल तैसे गुदरले. पुढे सन ११९४ साली धारवाड प्रांती फौजबंदी होऊन मुलुखगिरीस गेले. सन ११९५ व सन ११९६ दोन साला बदामी प्रांती तमाम फौजपो मुलुखगिरी करून छावणी केली होती. सन ११९७ साली मुलुखगिरी जाहली नाही. सन १२०० साली फौजबंदी करून कर्नाटकाकडे स्वारी जाऊन, दोन साल राहून, पटणापरयंत जाऊन, जेर करून, आपले कार्य सिध्य करून, फौजा माघारे देशास आल्या. सन १२०२ ता १२०३ दोन साले मुलुखगिरी जाहाली नाही. सन १२०४ साली निजामअल्लीच्या व श्री ।। सवाईमाधवरावसाहेबाच्या फौजेची लढाई दर जागा खरडानजीक होऊन, निजामअल्लीचा मोड करून, श्रीमंत माधवरावसाहेब यश घेऊन अखेर-साली जेष्ठ मासी पुणेस आले. पुढे सन १२०५ मधे अश्र्वीन शु ।। १२ द्वादशीचे दिवशी सवाईमाधवराव मयत जाहाले. तेथून राज्याची गर्दी होऊन, तमाम मुलुकाची खराबी जाहाली. मुलखास घणी नाही, याजमुळे बहुत लोकांची खराबी होऊन लोक बुडत आहेत. इस्तकबिल सन १२०५ तागाइत सन १२०८ परयंत असे. अश्र्वीन मास सु।। सन १२०८ सन तिसा तिसैन मया व अलफ हे हकीक लि ।। सही.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries