मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १८७.


१६९८ आश्विन.

पावलियाचें पत्र आलें नाहीं. तोंपावेतों उवरहि देत नाहीं. व दुसरें पत्र छ २८ रमजानीं येऊन पोंहचलें, त्याचें उत्तर छ २१ जिलकादीं त्यास बहुत जबाऊ नीचे फजीत करून लिहिलें. हा भाव कोसलदार मजकूर व फारमर साहेब यांणीं सांगितला कीं, हें सर्व आदिअंत बाईस लिहून पाठविता, हे आपले वचणावर कायम आहेत. मी येथील प्रसंगीचें वर्तमान साकल्य पत्रीं लिहिलें होतें, तें सर्व कौसलदार मजकूर यास विदित केलें कीं, याजकडीलही भाव कळला. तेव्हां तें सर्व ऐकून ह्मणाले कीं, हे सर्व सत्य परंतु ऐसें ऐकिल्यास धीर पुरणार नाहीं. ऐसें ल्याहावें कीं, येथें स्वामीचे कार्यास ठेवून च्यार महिने बसल्याविना कार्य केल्या येणार नाहींच. हा निश्चय असावा. या गोष्टीस फार दिवस गेले. एका मासाचे अंतरांत आठा दिवसांत किंवा पंधरा दिवसांत निदान येक मास ऐसें लिहिणें. शत्रूचा किमपि पक्ष धरनार नाहींत. जैसें कळेल तैसें सरकार -मसलतीस सादर होऊन, बोलले. करारप्रों निश्चितार्थच जाणावा. आजपावेतों जालें वर्तमान तिकडे लिहितों, ऐसें सांगितलें. तेव्हां यासी उत्तर केलें कीं, तुम्ही जैसें आपले यजमानास लिहितां, हे आमचे हितार्थच लिहितां, तर तेच आह्मांस आज्ञा केल्या आह्मी त्याप्रों विनंतिपत्रीं अर्जी करून लिहूं. तेव्हां ते बोलले कीं, हे आह्मांत सर्व जातींत ये गोष्टीची गळ आहे. आपणांत आपुन शत्रुमित्र असलियास भेदाभेद ठेवीत नाहींत. परंतु बाध्यात किमपीही बोलत नाहीं. तुह्मास कार्यासी गरज किंवा कथेसी गरज. सारांश, जे खुसीचा भाव तें करणें. आह्मास अगत्य करणें तें तर सांगितलें. किरकोळ पदार्थ तो तुम्हीं पत्रीं लिहिला आहे. तोच येथास्थित. ते गोष्टीनें धीर पुरणार नाहीं, याजकरितां सांगितलें. त्यावरून तपसीलवार पत्र लिहिलें ते तर आरतराम त्रिवाडी गुमस्ते गोपालनाथजी या.

(पुढें गहाळ.)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries