मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

मधींच लबाडी आपला जीव वाचवावयासी फितूर करीत आहे. तर गणोजीस उत्तम प्रकारें शिक्ष्या करून काहडून देणें ऐंसें निक्षूनतेनें पत्रीं विस्तारयुक्त लि।। आहे.’ यास अंतर सहसा नाहीं. आपणांस त्यापत्राबरोबर हा मजकूर लिहिलाच असे. येथील आमच्या येजमानाचा कायावाचें-करून गणोजीकडे किंचितही अंश नाहीं, ऐंसें असोन तेथें लबाडीनें जाबसाल करितो आणि आपण प्रसंगीं असतां, त्यांसी हरएक जाबसाली पेचून माकूल करीत नाहींत हे अपूर्व आहे ! आह्मी तर आपले दिवाणगिरीकरितां इतका बखेडा करून खूळ दूर केलें. ऐंसें असतां आपण चित्त या कामांत घालीत नाहींत आणि जैसें गणोजी बोलतो तैसेंच उगेंच श्रवण करितां, हें काय मर्जीस आपलें आहे हें न कळे. सरकारच्या नजराण्याकरितां वगैरे दूर-अंदेशा ध्यानास आणीत असलात तर आपण व राजश्री विष्णुपंत-बाबा जो दरबारीं सरदारीच्या बंदोबस्तीकरितां नजराणा व दरबार-खर्च वगैरे जो कबूल कराल तो आम्हांस कबूल असे. यासी अनेथा सहसा न जाणावी. जे समयी आपण तेथील निश्चांत (निश्चयांत ) डौल आणून लिहितील तेच समयीं पत्रदर्शनीं पांच लक्ष रुपये रोकडी स्वामीपाशीं पोंहचावितों. मुख्य आपल्या पत्राची मात्र प्रतीक्षा आहे. नाना ! शर्त हेंच की गणोजीने उपमर्द करून राजकारण ओढून न्यावें आणि आपल्या हातचा अर्थ त्यानें साधावा ! मंग काय ? रुपयासी अगे मागें न पाहतां जैसा जैसा डौल दिसेल तैसा तैसा साधून आपल्याच हातें सरदारीचा बंदोबस्त होय तो अर्थ साधिला पो. परंतु हा समय रक्षिल्यानें बहुत उपयोगीं आहे. मुख्य दाय दुसरियास येश घेऊ न द्यावे. आपण तपोनिधी आहेत. आपल्या तेज्यापुढें शूद्राचें सामर्थ्य किती ? चित्तावर धरल्यास हल( कें ? )च असे. आम्ही तर आपल्या भरंवसियावर हरएक प्रकारें निश्चिंत आहों. श्रीमंत राजश्री रावसाहेबांपाशीं व राजश्री बापूंपाशीं भीड खर्चून आपल्या हातें सरदारीचा बंदोबस्त करून घेतला पो. वरकड वर्तमान श्रीमंत राजश्री पाटीलबावाच्या पत्रावरून निवेदन होईल. कितेक अर्थ राजश्री शिवाजी विठ्ठलाच्या पत्रावरून श्रवणगोचर होतील. वरचेवर पत्रीं स्वानंदविलें पो. असेंहि करितां तेथील मर्जी पूर्णत्वेंकरून ऐसीच असली कीं विना पाटीलबावा भेटल्यावांचून बंदोबस्त होत नाही ऐसेंच निःकपटेंकरूनच असलें तर श्रीमंत राजश्री पाटिलसाहेबांस पंचवीस हजार फौजेनसीं आपले आज्ञेनुरूप घेऊन येऊं. परंतु गकारनामकाचे हातें तेथील अनुसंधान तुटे ते कीजे. येथील आमचे फौजेचें वर्तमान तर देशीं सर्वत्राचे घरोघर आह्मा पाशील लोकांच्या चवक्या पाठविल्या आणि 'छंद (फेद ? ) करितात, कबिले धरितात' ह्मणोन येथें वर्तमानेंहि आलीं आहेत. परंतु सर्वत्रांनी सर्व आशा सोडून श्रीमंत राजश्री माहादजी-बावांच्या जीवांचे सोबती जाले आहेत. एकदिल सर्व आहे. भावार्थ कीं श्रीमंत राजश्री पेशव्यांचे पायांशीं एकनिष्ठेनें राहून, वडिलांवडिलीं सेवाचाकरी करून, स्वामींचे सेवेवर देहहि समर्पण केले, ऐशीच धारणा धरून आहेत. सेवेशी श्रुत होय. या लोकीं कीर्ति मेळवावी. मागेंहि मेळविली आतांहि त्याप्रमाणें करावी. या उपरि मर्जी गकारनामकावर असली तर सेवक लोकांस तैसी आज्ञा करावी. दिशी (देशीं ? ) तों जागा नाहीं. मग जिकडे ईश्वर जागा राहावयास देईल तिकडे जाऊं. मग स्वामीच्या मरजीस येईल ते करावें. आम्ही तों स्वामींचे म्हणवितों. परंतु स्वामींच्या मरजीं न आलें! बरें होणार तें सुखैनैव हो. या उपरि स्वामींनी अंतःकरणापासून जें असेल तें सेवकास आज्ञा करावी. हें निदान जाणोन सेवेशीं विनंतिपत्रें लिहिलीं आहेत. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे हे विज्ञप्ति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries