मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

तूर्त तुह्मास पुरा आश्रय हि तेथे कोणाचा नाही व ही मसलत सेवटास न्यावी सर्व दौलत स्वामीची च आहे ते जे करितील ते आमचे कल्याणाचे च करतील हा भरसा मला आहे सदरहू निरोप बाबापासी आला त्याणी सागितला नतर विठलपतबावनी मला बोलाऊन सदरहू आज्ञा आली ती सागून पुन्हा चार साहा घटका गेलियावर मी काय सागितले ते मला पुन्हा तुह्मी सागावे मग मी बाबानी सागितल्याप्रमाणे सागून बाबास मी बोललो की आपण मला आणखी एकवार सागावे नतर त्याणी सागितले की मी सागितल्याप्रमाणे आहे बातमी फार नाजूक जिवावरील आहे बहुत तजविजेने राहावे आणि लाहान माणसाची सगत असल्यास करू नये कारण माणूस स्नेह्यापाशी बोलले त्यात ही गोष्ट निघाली ह्मणजे घात होईल नतर मी विनती केली की येविसी आपण सहसा काळजी करू नये प्राण जरी गेला तरी बोलणार नाही हा भरवसा आपणास बोलून दाखऊ तो काय आपण काही काळजी करू नये नतर आमची खातरी जाहली आहे परतु आपण मात्र जपून राहावे काशीपताची बातमी फार आहे किल्यावरून येणाराची बातमी ठेवितात मग मला बोलले सर्व पार करणार स्वामीचे पाय आहेत माहाराज राज्य करू लागल्यावर तुझे वतन सोडून बदोबस्त करीन ह्मणोन शफत कुलस्वामीची दिल्ही नतर निरोप दिल्हा की चाफळास जाऊन सदरहू मजकूर श्रीस्वामीस व चिटणीसास सागितले ऐकून बहुत सतोष जाहला नतर पुन्हा दोन महिन्यानी मला पुण्यास पाठविले आणि साहेबास सागावे की किल्यावर पेशवे याणी महाराजास फार अडचण करितात मोठे संकटात आहेत याचा विचार काय करावा नतर साहेबास जाऊन सदरहू मा।र सागितला त्यानतर त्याणी चिठ्या पावल्याचा मा।र विचारून बोलले की बाजीराव साहेब याचा बिघाड तहप्रकर्णी पेशव्याकडून जाल्यावर माहाराजासी दोस्ती पुरी करणे किंवा कसे सागणे ते सागू बोलले नतर बोलणे निसरडे पाहून मी उत्तर केले की अशा सागण्यानी बचाव कसा होईल बदोबस्त करून देतील हा भरवसा आह्मास फार आहे नतर सागितले की बाजीराव साहेब यानी तहाचा बिघाड करण्याचा इरादा तूर्त केला आहे बिघाड लौकर च होईल सागावे फिकीर न करणे बोलून निरोप दिल्हा सदरहू निरोप स्वामीस व चिटणिसास व विठलपतबाबास कळविला नतर किल्यावर कृष्णाबाई व नारोळकर याजपासी सागून पाठविला त्याचा निरोप पुन्हा आला नाही सा। उपाध्ये व नरसू काकडे याजसमागमे सरकारास सदरहू बातमी पावती करण्यास बाबानी सागून मला परत जावे सागितले मी परत गेलो दादासाहेब बाळासाहेब व चिटणीस पुण्यात च होते तो पुढे वैशाखमासी साहेब याणी पुण्याभवता पलटणचा वेढा दिला किले वगैरे घेतात असे दादासाहेबास कळले नतर मजबरोबर साहेबास सागून पाठविले की हाली बाजीरावसाहेबाचा व आपला बिघाड आला पुढे कसे करता त्याणी सागितले की आह्मी किले वगैरे घेतले त्याची मु॥ त्याणी केली आहे तुह्मी माहाराजास कळवावे नतर मी सातारियात येऊन विठलपतबाबास सदरहू मा।र सागून किल्यावर बातमी पोचविण्यास फार अडचण आहे बाबानी सागितले दाजी नारोळकर व नरसू काकडे याजपासून युक्तीने कळवितो बोलले मी निघून पुण्यास चिटणीसाकडे स्वामीची भेटी घेऊन गेलो तो पुढे काही दिवसानी बाजीरावसाहेब याणी बिघाड करून लढाई होऊन बाजीराव साहेब सासवडास गेले त्या सधीत बाळासाहेब चिटणीस बोरगावी गेले होते

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries