मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

लागले मातोश्रीस नरसोजीबावानी विचारिले आपणास मसूरकर म्हणून पाचारताती हे वर्तमान आपणास सागणे आपले ठिकाणा वतन सागणे मातोश्रीने मसूर वतन सागितले आणि पाहिले पासून जाहलेले वर्तमान तेही सागितले ते चित्तामध्ये धरून तेच रात्री मातोश्री स्नानास उठली गळृयातील ताईत काढून घरामध्ये ठेविला त्यात पधरा व्होन होते नरसोजी बावानी ताइतातील पधरा व्होन घेऊन न पुसता विजापुरास गेले तेथे जाऊन मसूरचा मोकासा मलिकइनीस पाछाचा सुरतचा जावई त्यास भेटले त्याणी नरसोजी बावास हालीचालीत शाहाणा पाडून देवडीस ठेविला काही एक दिवसा राहून मलिकइनियाचे बायकोस अर्ज केला की आपण मसूरचे पाटलाचा लेक आपले वतन जबरदस्तीने बागवान कराडकर यानी घेतले आपले वर्तमान वडिलाची हकेकत सागितली त्यावर बायको बोलिली जे मलिकइनीस दिवाणातून आलेवर त्यास वर्तमान सागते दुसरे दिवसी मलिकइनीस यानी नरसोजी बावास बोलावून हकिकत विचारली त्यास त्यावरून नरसोजी बावानी आपले वडिलाचे वतनाचा करिना सागितला व बागवानाचे कर्ज पाढरीवर थोडकेच होते परतु मनसूबी न करीता बागवानानी नायबाचे पाठी करून वतन घेतले आपला बाप कैदेत घालून त्याचे मरण केले आणि आपण परागादा जाहालो त्यावर आपण मायबाप धणी आहेत माझी मनसुबी करून आपणास वतनावर बैसवावे एतकियावरून मलिकइनिसाने अभय दिल्हे की तुझी मनसुबी करून तुझे वतन तुझे दुमाला करून पोटाची वस्त्राची बेजमी करून दिली घरामध्ये ही बायकास सागितले की वतनदारचे मूल आहे त्याची खबर घेत जाणे इतकिया उपर काही दिवस असता तुरकानी कसबे मजकूरची रसद भरून रसदबा। कोळविलातीची भुते रवाना केली कसबे मजकूरचा माहार बाबनाक पलसिकर रसद घेऊन विजापुरास मलिकइनीस मोकासी याचे घरास घेऊन गेला तेथे नरसोजीबावा याची गाठी न पडता देवडीच्या लोकानी म्हारास खासपागेस ठाव दिल्हा म्हार जाऊन पागेस राहताच घोडा मेला व बायकोस तेच भूत लागले हे वर्तमान मलिकइनीस दरबारी आयकून घरास आले शाहारातून पचेक्षरी आणोन बायको सावध केली इतकियात ह्मार कसबेमजकूर याचे आगी भूत बोलू लागले की आपणास बागवानानी कोळविलातीतील आणोन रसद बरोबर पाठवून पाटलाचे मूल मारावे आपणास पानी देऊन माघारी लावून दिल्याने आपण माघारी जाऊ याउपरी मलिकइनीसानी पानीचा खर्च देऊन माघारी रवाना केली ते कसबेमजकूरास येऊन पोचली त्याजपैकी बागवान कसबेमजकूरी राहिले ते गावातून बाहिर गेले मग मलिकइनसानी बागवानास तलब करून हुजूर आपणापाशी नेहले हुजूर करीना मनास आणिता तुरक बागवान बोलला जे आपणासी स्थल देणे इनिसानी त्याजवरून स्थळ कराडचे उभयतास दिल्हे उभयता कराडास आले कराडी पचाईत होऊन बागवान खोटा केला कराडची सडी घेऊन नरसोजीबावा विजापुरास गेले समागमे तुरक ही गेला तेथे गेलेयावर तुरकानी अर्ज केला की जातिभाऊ आपली मनसोभी जाहली नाही याउपरी इनिसानी पैट्टणचे स्थळ उभयतास नेमून बरोबर आपला हुजूरचा म्हालदार देऊन हरदो वादेयास पैट्टणास रवाना केले तेथे बाबाजीराव पैठणकर याणी पचाइती करून तुरक खोटा केला तेथून सडी घेऊन विजापुरास इनिसापासी गेले याउपर कराडची व पैठणची सडी मनास आणिता म्हालदार याणी जबानी सागितले की तुरक जबरदस्तीने वतन खाताती वतन जगदळे याचे खरे

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries