मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

त्यावरी काळो पाटीलाचा लेक आपाजी पाटील व धुलो पाटिलाचे लेक पाच जण वडील लेक रामाजी पाटिल दुसरा चागो पाटिल तिसरा काऊजी पाटील चवथा बहिरोजी पाटील पाचवा मबाजी पाटिल व रखमावा व पिलावा ऐसी पाटणात राहिली पाटणी राहून उबरजेवरी दावे केले दावे करिता करिता चागो पाटिल व काऊजी पाटिल व बहिरोजी पाटिल हे तिघे सटवोजीच्या वडिलानी मारिले त्यावरी हिरोजीराऊ पाटणकर व आपला वडिल अबाजी पाटिल भाडिळेमध्ये होते त्यास गोदाजी घोरपडे भाडळेकर त्यानी आपली कन्या हिरोजीराऊ पाटणकर यासी दिली लग्न जालेवरी हिरोजीराऊ पाटणास यावयास सिध जाले त्याबराबरी अबाजी पाटिल हि निघाले मग गोदाजी घोरपडे यानी सेभर श्वार हिरोजीराया बराबरी देऊन पाटणास जबरदस्तीने पाठविले हिरोजीरायानी आपले भाऊबदास नसीयत करून वतन खाऊन लागले मग हिरोजीरायाची माय चादावाने लेकास सागितले जे तुह्मी आपल्या वतनावरी एऊन बैसला आणि आपले भाचे आपल्या वतनावरी तुह्मी नेऊन बसवा ना तेव्हा थोरले राऊ तुह्मास श्वर्गी हसतील त्यावरी हिरोजीरायानी मान्य करून आपले वचन खरे करितो ऐसी बोली जाहाली हे वर्तमान सटवोजीच्या वडिलानी ऐकिले मग ज्यानी मारा केला होता त्यानी नाईकजी अबाजीने रसद विज्यापुरास जात होती ते लुटली ते दिवाणास कळले त्यानिमित्य कैद करून दिवाणाने नाईकजी अबाजीची डोचकी मारिली नाईकजी अबाजीचा भाऊ दिवजी व त्याचा लेक लखमोजी व अबाजीचा लेक नरसोजी हे सटवोजीचे आजे अबाजी पाटिल व रामजी पाटिल पाटणी होते त्याचे समजाविसीस आले मग अबाजी पाटिलाने हिरोजीरायास सागितले जे आपले भाऊबद गावी हाऊन समजाविसीस आले आहेत त्यास हिरोजीराऊ बोलिला की त्यानी गोत्रहत्या केल्या आहेत त्याचे तोड पाहू नये मग अबाजी पाटिल व रामजी पाटिल बोलिले की आपले मारे केले त्याचा जबाब करितील मग मुतालीक हाती देईन मग त्यास हिरोजीरायाने सटवोजीच्या आज्यास लखमोजीस व नरसोजीस बोलाऊन पुसिले जे तुह्मी मारा केला त्याची वाट काय करिता त्यावरी लखमोजी व नरसोजीने जाब दिल्हा ज्यानी मारा केला ते आपल्या कर्मे गेले आपल्याच्याने खुनाची वाट होती ऐसे नाही आपली तकसीम आह्मी खाऊन राहू त्यानी रामजी पाटिलाने व अबाजी पाटिलाने गावास यावे आह्मी आपला कामकारभार व निमे तकसीम व वडीलपण करावे माहार नागर पटि पछोडी जे वडिलपणाचे मान जे असतील ते खावे ऐसी बोली हिरोजीरायासी त्यानी केली मग हिरोजीरायानी अबाजी पाटिलास रामजी पाटिलास बोलाऊन सागितले जे तुमचे भाऊ न्यावयास आले आहेत तरी तुह्मी गावास जाणे त्यावरून अबाजी पाटिलाने व रामजी पाटिलाने विचार करून हिरोजीरायास जाब दिल्हा जे आपले पोटी सतान नाही हे गावास नेतील आणि दगा करितील आपल्याच्याने गावास जावत नाही लखोजीचे व नरसोजीचे मनामध्ये समजावीस करून न्यावयाचे असेल तरी मुतालीक देऊन त्यावरून लखमोजीने व नरसोजीने आण भाश क्रिया करून हिरोजीरायाचे गुजारतीने आमचा मुतालीक हाती धरून गावास आले गावी मुतालीक आपले वडिलपणाचा काम कारभार करू लागला एक दोनी साले गावी होता त्यावरी हिरोजीरायावरी विज्यापुरीहून मोहीम जाहली ते मोहिमेमध्ये पडिले ऐसे ऐकून त्या माघारे मुतालीक मारला त्यावरी अबाजी पाटिल व रामजी पाटिल या दोघामध्ये सात पाच लेक जालेवरी अबाजी पाटिल व रामजी पाटिल हे गावास आले मुतालिकाची वाजीपुसी केली त्यावरी कर्‍हाडीच्या दिवाणास सटवोजीच्या वडिलाने सागितले की हे ह्मणजे हिरोजीराव पाटणकर याचे मेहुणे आहेत मग कर्‍हाडच्या दिवाणास सांगोन धरून नेले उपरातील कर्‍हाडीच्या फौजदाराने हुजूर पातशाहास लिहिले जे हिरोजीराव पाटणकर याचे मेहुणे आबाजी पाटिल उबरजकर धरून आणिले आहेत त्यासी ठेवावे की जिवे मारावे या बाबे जो हुकूम येईल त्याप्रमाणे वर्तणूक करू ऐसे लिहिले उपरी मग द्यानतरायानी पातशहास अर्ज केला जे हिरोजीराव पाटणकर पुड होता तो मारिला गेला हे त्याचे सोइरे आहेत उबरजचे पाटिल आहेत सोइरे जन जनाचे असताती

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries