मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

कसब्याखेरीज पांचा गावी पांच वाडे मोठे आहेत लाहान लिहिले नाहीत याप्रमाणे ते काली वडीलाची नादनूक होती धनी हि चालवीत होते वडील दिवाणदारी करीत होते ते समई जोसीयाचे वाईट केले नाही ऐसे असता जोसी आमचे घर बुडवावयासी बसले आहेत तरी आमचा खरा विषय आहे श्रीमंत सार्वभौम आहेत तुह्मास येथील अधिकारी सांगीतला परशुरामपंत दादायाणी चौकसी केली आहे ती कोठवर लिहावी कागदपत्र आपणाकडे पा। आहेत आपण कचा मजकूर श्रीमंतास समजावावा चिरंजीव राजश्री बालभट्यासी आपणाकडे पाठऊन द्यावे ऐसे असिल्यास लिहावे पत्र येताच पाठऊन येऊ श्रीमंतांच्या राज्यात आमचा भाग्योदय अधिकोत्तर जाहाला ऐसे नाही किंवा कसब्यातील वतनदारी बुडाली याकरिता वाडा बांधावयाचा उद्योग केला ऐसे नाही खोती कुलकर्ण मानपान सर्व चालत आहेत श्रीमंतांचे सामराज्य जाले चिरंजीव बाबास संतान नाही या जाग्यात राहिल्याने संतान होईल ऐसे जोसी याणी भविष्य सांगीतले व मुलाची जागा दिवा लावावा आणि चिरंजीवास एक वर्षभर कुटुंबसुध्दा ठेवावा याउद्देशे एक सोपा बांधिला आहे जोसी याणी आमचा नव्हे ह्मटल्याने नव्हेसा होणार नाही आह्मी देशमूख माहालचे गाव बाहात्तर आहेत इतके खोत व माहार व गुरव यांस आमचा वाडा ठाऊक आहे चिंता नाही धन्यानी चौकसी मात्र केली पाहिज च्यतुर पुरुष जाणे राजवाडे पाहिल असतील त्याणे आमचा वाडा पाहिल्यानंतर ब्राह्मणाची वस्ती वाडा मातबर वस्तीचा ऐसे तेव्हा च ध्यानात येईल जोसी सरकारचे हितकर्ते ह्मणावे तरी कसब्यात सरकारी जाग्यावरी सरकारची आज्ञा न घेता व आह्मी पांढरीचे धनी त्यास हि न पुसता आपाजी नरसी गानू याणी वाडा बांधोन राहिले व झाड माड हि केले आहे त्याची गोष्ट सरकारांत बोलत नाही आमचा विषय खरा असता ज्ञातिद्वेष करितात यास आमचा उपाय काय परंतु श्रीमंतांचे घरी हा विचा नाही वेदशास्त्रसंपन्न राजश्री विद्याधर जोसी यांचे पिते कैलासवासी कृष्ण जोसी यांची आह्मावरी बहुत च कृपा होती ती त्याणी पाहिली आहे व विद्याधर जोसी हि कृपा च करितात त्यांचे भाऊबंद येथे बंखेडे करितात परंतु ते यात तिलतुल्य यमन घालीत नाहीत प्रस्तुत आमचा भोग आहे कसब्यात आमचा बारा खंडीचा कुणबाब आहे लोकांस जागे मिरास करून वडीलांनी व आह्मी परंपरागत देत च आहो ऐसे वर्तमान असता दरबारांत विचार करून आज्ञा होत नाही तेव्हा कालमहिमा व आपला लाभकाळ असो आमचे त्राते तुह्मी आहा भाऊ तुमचा व माझा स्नेह त्याचें सार्थक हे च आहे हाली दोन जोसी सड्याची बातमी सांगावयाकरिता गेले आहेत तरी परशुरामपंत दादाचा लेख च श्रीमंतांस दाखवावा श्रीमंत कैलासवासी बाजीरावसाहेब सुपेयाहून सासवडी देशमुखाचे वाड्यात राहिले तेथे पुरंदर्‍ये आले ते देशमुखयाचे वाड्यांत येऊन राहिले श्रीमंत नानासाहेब यांचा जन्म देशमूख यांच्या वाड्यात जाहाला हे वर्तमान तुह्मास दखल असावे बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंति

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries