मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

तिमाराव देशपांडे यांस सैदमुजवरखां                                            लेखांक ११०.                                                         १७१४ पौष वद्य ८.
व बाजीराव यांची पत्रे घेऊन पाठविली.

सैदमुजवरखान यांचे तिमारावजी सलमहु रावसाहेब मेहरबान दोस्तां आज तारा सैदमुजवरखांजी.
सलाम बाजद सलाम महवल मकसूद आं की एथील खैर छ २१ माहे जावल मुा शहर हैदराबाद जाणून तुह्मी आपली खुशखबर लिहून दिलआरामी करीत जाणे दिगर मार रावसाहेब मेहरबान राव गोविंद कृष्ण यांची तनखा सरकारातून चाळीस हजार रुपयांची पेशजी जाली त्याचे नवाजषनामे दोन अखेर रावलचा वायदा वीसहजाराचा व दुसरा वायदा अखेर शाबान वीस हजाराचा या दो वायद्यापैकी अखेर रावलचा करार गुजरून गेला एथे त्यानी ऐवजाकरिता निकड लाविली याजवरून आपणास लिहिलें जाते जे रावसाहेब गोविंद कृष्ण यांचे मोहरेनसी रसीद विसा हजार रुपयाची व हें पत्र भुकणदास व्यंकटीदास साहूकार यांचे गुमास्ता हे दोन्ही दस्तऐवज घेऊन येतील ते आपणाजवळ ठेऊन ऐवज त्यांचे पदरी घालून सावकाराचे गुमास्तियाचें कबज घ्यावें व नवाजष-नामा या वायद्याचा रावसाहेब गोविंद भगवंत पुनियास गेले त्याचबरोबर गेला सबब मुजरद हरकारा यांचे पत्र नवाजषनामा आणावयास पा असे तोहि आठ चव रोजानी येईल आणि चाळसा हजार रुपयांचा तमसुक आहे त्याजवर वसूल मांडून देऊ ऐवज देणियास दिकत हरगीज न करावी पत्र पावताच ऐवज घ्यावा ज्यादा काय लिा हे किताबत ताजाकलम सावकाराचा गुमास्ता वसमतीस येणार नाही तुह्मी गोपाळ नाईक सराफ याजबराबर सदरहू रुपये नांदेडी पाठवून साहेब मोहिदीन यांचे मारफातीने देऊन कबज रसीद घ्यावी.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries