मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

जिवनराव पांढरे यांचे पत्राचे उत्तर.                                                लेखांक १६३.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.

राजश्री जिवनराव पांढरे समसेरबाहादूर गोसावि यांसी-

5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें नवाब बंदगानअली यांची स्वारी बेदरास येणार कर्जदार वगैरे कितेक लोकांचे तंटे येविषीचें बंधान असावे ह्मणोन लिहिलें त्यास बंदगानअली यांचे निघण्याचा निश्चय जाला आहे कर्जदार वगैरेचे जाबसालाविषई नघाब अजमुलउमराबाहादूर यांसी बोलणे ते प्रसंग पाहून बोलण्यात येईल तुह्माकडील कार्यास इकडून अनमान व्हावयाचा नाहीं राजश्री आनंदराव लिहितील त्यावरून कळेल निरंतर पत्र पाठऊन संतोषवीत असावें रा छ ५ माहे षाबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries