मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

पत्र व्यंकाजी शामराव यांस                                                        लेखांक ३८.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १५.
धाराशीव-प्रकरणीं बळवंतराव हरी
यांजकडून पाठविलें छ १३ राखर.

राजेश्री व्यंकाजी शामराव खामी गोसावी-
पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें विशेष मौजे बावी व मोरडे या गांवचा सिवेचा कजिया फार दिवस आहे कजियाचे राणांत हरदो गांवांनीं पेरूं नये पुढें निर्णय ठरेल त्या प्रा वर्तावे ऐसें असतां मोरडेकर दुईचे रानांत नांगर धरून खटला करितात ते नांगर धरूं नयेत धरले ते सोडावे याप्रो तुह्मांस समक्ष राजश्री गोविंदराव यांणीहि सांगितले परंतु अद्याप गांवकरी यांचे नांगर सुटत नाहींत ह्मणोन कळलें हे गोष्ट चांगली नाहीं येणेकरून कजिया होईल या उपरि गांवकरी यांस निक्षून सांगोन कजियाचे जमिनींत नांगर धरले ते सोडून नेणें बोभाट येऊ न द्यावा या पत्राचें उत्तर पाठवणें रा छ १३ राखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries