मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

झाडास फळें येतात.
प्रकरण ६ वें.

१६६२ त शिवाजीच्या कारकीर्दीच्या तिस-या भागास प्रारंभ झाला. हा वेळपर्यंत मोंगल सैन्याच्या वाटेस शिवाजी बिलकुल गेला नाहीं. १६५७ त मात्र त्यानें एकवेळ जुन्नर शहर लुटलें होतें. या हल्याखेरीज दोन्ही पक्षांत उघड वैर दाखविणारी १६६२ पर्यंत दुसरी कोणतीच गोष्ट घडून आली नाही. शहाजहानचे वेळीं तर त्या बादशहास शरण जाण्यास शिवाजी 'एका पायावर तयार होता. असें करण्यांत विजापूर दरबारास दहशत घालून आपल्या बापाची सुटका करून घ्यावी एवढाच केवळ शिवाजीचा हेतु नव्हता. त्यास शहाजहानापासून आपले कांहीं हक्क कबूल करवून घ्यावयाचे होते. हे हक्क शिवाजीस देण्याचें शहाजहानानें अभिवचनही दिलें होते. मात्र त्याबद्दल दिल्लीस येऊन शिवाजीनें दरबारांत स्वत : मागणी करावी एवढीच त्याची अट होती. विजापूरचा वेढा उठवून दिलीतख्ताच्या प्राप्तीसाठीं आपल्या भावावर चाल करून जाण्याचे वेळीं, औरंगजेबानें कोंकणपट्टीवरील शिवाजीचें स्वामित्व कबूल केलें होतें. शिवाय काही निवडक स्वांरानिशीं पादशहाची नोकरी पतकरून नर्मदेच्या दक्षिणेकडील पादशाही मुलखांत शिवाजीनें शांतता राखावी, अशीही त्यानें एकवेळ इच्छा दर्शविली होती; पण सार्वभौम दिल्लीतख्ताचें एकछत्री आधिपत्य हातीं आलें तेव्हां या सर्व गोष्टी तो विसरला. १६६१ त एकाएकीं मोंगल सैन्यानें शिवाजीचें अगदी उत्तरेकडील ठाणें जे कल्याण शहर तें हस्तगत करून घेतलें. शिवाजी या वेळीं विजापूर दरबाराशीं लढण्यांत गुंतला होता. त्यामुळें या अपराधाबद्दल मोंगल सैन्यास योग्य प्रायश्चित्त त्यास देतां आले नाहीं. पुढें १६६२ त विजापूर दरबाराशीं जेव्हां त्यानें तह केला, तव्हां त्याचा सेनापति नेताजी पालकर यानें औरंगाबाद येथील मोंगल फौजेवर पहिला हल्ला केला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries