मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[२५८]                                                                       श्री.                                                                 १९ मे १७२९. 

श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत. प्रा। विनंति येथील कुशल ज्येष्ठ शुध्द तृतीया इंदुवासरपर्यंत यथास्थित असे. विशेष. स्वामीनीं हडपियाविशी आज्ञा केली त्याजवरून हडपा पेटी पा। असे. घेऊन पावलियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. कृपा असो दीजे. हे विनंति.



[२५९]                                                                       श्री.                                                                

पुरवणी श्रीमत् सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा वडिलाचे सेवेसी.
विनंति उपरी मौजें गोठणें त॥ राजापूर हा गांव श्रीस इनाम आहे. ते जागा खारट दर्या गेला आहे. ते बांधोन पिकास आणावें, या अर्थें कृष्णंभट देसाई तपे मजकूर यास बंदिस्तीविशीं आज्ञा करून वीस सालें बंदिस्तीच्या सालापासून माफ व पुढें धारेयाचा शिरस्ता करार करून दिल्हा आहे. त्याप्रमाणें आपणही कौल दिल्हा पाहिजे, ह्मणोन स्वामीनीं आज्ञा केली. ऐशास मौजें मजकूर स्वामीकडे दिल्हा असतां खारीच्याच बंदिस्तीचा कौल कशास पाहिजे ? जो स्वामींनीं कौल दिल्हा असेल त्या प्रों। खारीची बंदिस्त होऊन माहूर होईल. वरकड राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान यांच्या व नबाब निजामुन्मुलूक यांच्या भेटी जाहाल्याचा अर्थ आज्ञापिला व र॥ अंबाजीपंत यास पंडित म॥ निले पत्र आलें होतें तें पाहावयास पाठविलें. त्याजवरून साद्यंत कळलें. व लष्करांतून मुजरद जोडेकरी पत्रें घेऊन येथें आले होते. विदित झालें पाहिजे. कुडतीं सिध्द जाहली ते पाठविलीं आहे. प्रविष्ट जाहल्याचें उत्तर पाठवावयास स्वामी वडील आहेत. बहुत काय लिहूं ? कृपा असों दीजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries