मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

स्वामी ज्याप्रमाणें आज्ञा करतील त्याप्रमाणें आह्मीं वर्तणूक करूं. यासी अंतर करूं तरी श्रीकानोबा यांची व स्वामीचे पायांची, खाशाचे पायांची शपथ आहे. मानाजी आंगरे यांचे वाईट करणार नाहीं. सर्व दौलत त्यांचे स्वाधीन करीन आणि त्यांचे चालवीन. काडीइतकें अंतर करणार नाहीं. त्याचें वाईट करावें तरी दुसरा कोणी मजला भाऊबंद आहे कीं काय ? हें बावा ! आपण चित्तीं आणावें. त्यास तो जिवासाठीं भय धरील, कुलाबकर लोकांचें कांहीं वाईट करीन हें त्यांचे चित्तीं येईल, तरी तेही गोष्ट करणार नाहीं. सर्व अन्याय माफ करीन. चालवीत होतों त्याहीपेक्षां विशेष चालवीन. यासी अंतर असेल तरी आपले पायाची शपथ आहे. आजवरी आमचें चित्त निखालसपणावरी आहे. दुसरा अर्थ नाहीं. स्वामींनीं अगोदर न जावें. दसरा जालियावरी आह्मीं सुवर्णदुर्गीं येतों. तेथून स्वामीस कागद पाठवितों. तेथें स्वामीनीं येऊन भेटी घ्यावी. स्वामीस सर्व अर्थ निवेदन करू. मग स्वामींनीं पुढें कुलाबास जावें. आह्मीं मागाहून येऊन. आपण गेलियावरी तो स्वामीची गोष्ट ऐकेल. न ऐकेसा नाहीं. असें असोन न ऐके तरी स्वामीची इतराजी होऊन त्याचें बरें होणार नाहीं, ही आमची निशा आहे. स्वामी आमचे मस्तकीं आहेत तों आह्मीं कोणाचा हिसाब धरीत नाहीं. अगोदर आपणांस लिहीत आहें. आपण सुवर्णदुर्गीं भेटी घ्यावी. पूर्ण आशीर्वाद विजयदुर्गी दिला आहे तो खरा करून एक वेळ कुलाबासआपण आह्मीं जावें, वडिलाचे जागा जाऊन बसावें, ऐसा हेत आहे. तो पूर्ण करणार स्वामी समर्थ आहेत. हें पत्र लक्ष पत्रांचे जागा हें पत्र मानून, ये गोष्टीसाठी जागोजाग जेथें स्वामीची ममता आहे तेथें राजकारण लावून, स्वामीचे पदरीं यश पडे तो अर्थ आजीपासून साधना लाविला पाहिजे. आह्मीं लेकरांनीं वारंवार कोठपावेतों ल्याहावें ? हे गोष्ट आपण चित्तावरी न धरीत, आमची हेळणा करितील तरी खासे स्वर्गीं काय ह्मणतील तें ध्यानीं पाहून घ्यावें. आशीर्वादउत्तराचा मार्ग लक्षीत राहिलों. उत्तर पाठविलें पाहिजे. बहुत ल्याहावें तों स्वामी वडिल आहेत. कृपालोभ असों द्यावा हे विनंति.

                                                                                                                                                          265

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries