मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३०६]                                                                       श्री.                                                                  २१ जुलई १७३२.

सहस्त्रायु चिरंजीव संभूसिंग आंगरे मु॥ विजयदुर्ग यासी आज्ञा केली ऐसीजे :-
तुमचें त्याचें खालें लागलें. याजकरितां यंदां समाध कृष्णातीरीं घेतली होती. श्रीदयेनें, तुमच्या पुण्यें, उठोन धावडशीस आलों. शरीर बहुत कृश जालें आहे. वाचावें ऐसें नव्हतें. श्रीची इच्छा प्रमाण ! वार्षिक समाधिविसर्जन कानोजीपासून भार्गवक्षेत्री संतर्पण तुमचें हातें असे. यंदां तुच्या पुण्यानें, भार्गवक्षेत्री संतर्पण होत असतें त्यापेक्षां, विशेष येथें जालें. साताराहून पवार सरदार येऊन मठांतून पालखीत घालून आणिले. कळावें ह्मणोन लिहिलें असे. कानोजीमागें ह्मातारपणीं तुह्मीं आह्मास कार्यास याल ऐसा बहुत भरवसा धरिला होता. त्यास, श्रीचेठायीं तुह्मीं उत्तम वर्तणूक करीत नाहीं. बरें ! तुह्मी सुखी असलेत ह्मणजे सर्व पावलें. कृष्णंभट देसाई दुर्बळ आहे. अंत:प्रभू घाटयाचे कज्जामुळें बहुत कष्टी जाला आहे. हाल्लीं तो दुष्ट त्या प्रांतें गेला आहे. तुह्माकडेस गेला असला तर त्यास बरीशी नशेदच करणें. लबाड मनुष्यास जवळ केलीयास आपला भार वाढत नाहीं. कृष्णंभट याजवर दया करून, त्याचें हरएकविशी चालविल्यास संतोषी होऊं. तुह्मांस समाधिविसर्जनसमयींचा प्रसाद वस्त्र, कुसुंबी शेला अंगावरील पाठविला आहे. अंगीकार करणें. यंदां तरी तारवटी जिन्नस हातास आला तर पाठवावा. व पुढें कार्तिक मासी कोन, कारिंदे, कणगे, प्रांतांतील आज्ञा करून रवाना केली पाहिजे. हे आज्ञा पूर्वी पत्री तुह्मास लिहिली. तेथें तुह्मास लिहिलें होतें जे, तुमच्या हितावर आहे कोण आणि नाही कोण हें चित्तांत येऊं देणें. तिनी जखमा जर काढशील, तरच तूं कानोबाचा पुत्र खरा. चिरंजीव सखोबास कांहीं बोल नाहीं. तुमचेठायीं त्यांची माया विशेषच आहे. त्याचे मनांत तुमचे ठायीं विषमता नाहीं. जे तुमच्या वाईटावर असतील त्यांस पाहोन घेणें. जाणिजे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries