मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[२२]                                                                                 श्री                                                                    २२ आगष्ट १७४०                                                         
                                                                                                         
श्रीमत् परमहंसश्री स्वामी याहीं.

चिरंजीव जगन्नाथ यासी आज्ञा. आह्मी निघालों तें छ १० रोजीं श्रीस्थळीं पावलों. वेट्याबरोबर सुंभ, काथ्या वजन icon 1२ दोन मण, असोले नारळ सु॥ ५ पाठविले आहे. काथ्या, सुंभ निगेनशी ठेवणें. व नारळ पाठविले आहेत, यांजपैकी चिरंजीव शाहूस दोन देणें, व चिरंजीव सौ॥ सगुणाबाईस२१ दोन देणें, व तुह्मी एक घेणे. येणेंप्रमाणें करणें. चिरंजीव चिमाजीअप्पा२२ याजकडे श्रीचे जामदारखान्यापैकी ऐवज येणें आहे. त्याचा हिशेब त्यांणीं करून पाठविला होता. तो पाहून त्यांजकडे दोन माणसें बरी हुशार पाहून पाठविणें. रुपये आणून ठेवणें. राजेश्री यशवंतराऊ पवार यांजकडून भिक्षेबद्दल दुचाला तीन हजार रुपये येणें. त्यांजकडे केसोबा रवाना करणें. अनेवाडी येथील झाडांची नीट रखवाली करणें ह्मणोन अंतोबास सांगणें. आह्मीं तर एवढे तुह्माकरितां श्रम करितों. चिमणाजीचें पुत्रवत् पालगृहण केलें. तो तर आह्मांस टाकून गेला. हा मृत्युलोक, आमचा भरवसा आहे असें नाहीं. काय ते आमचे पुत्र व शिष्य तूंच आहे. मेळविले गांव, शीव, पैका पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें खाणें. तुह्मांस कोणी उपद्रव देणार नाहीं. मजमागें तुमचें शाहू चालवील. कोणते गोष्टीचे चिंता न करणें. जो उपद्रव देईल त्याचा निर्वंश होईल, हें समजणें. आह्मी वैशाखमाशीं येऊं. चिरंजीव शाहूस पत्र पाठविलें आहे. तुह्मीं जाऊन देणें व नारळ देणें. आणि जे इंदापूरचे तळ्याचा बंदोबस्त ठेवणें ह्मणोन सुलतानभाईस लिहिणें. वाड्यातील चौकी पहारा नीट बंदोबस्त ठेवणें. जाणिजे. हे आज्ञा.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries