मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ १३६ ]

श्री. शके १६६१ चैत्र-वैशाख.

राजश्री पिलाजी जाधवराव यांसि आज्ञा केली ऐसी जे :--

तुह्मी वसईस गेलां होता, शरीरीं सावकाश नाहीं ह्मणोन घरास आलां, ऐसें परस्पर कळले. परंतु तुह्मीं कांहींच न लिहिलें. अपूर्व आहे ! याउपरि आपले शरीरभावनेंचें वृत्त सविस्तर लिहिणें ; व उपाय करणें. अळस न करणें. औरंगाबादप्रांतीं लाल चिंचा आहेत त्याणीं पांघरूण रंगतें व मुरंबा करीत असतात. लाल असते तिचें प्रयोजन आहे. तरी मुजरद जासूद पाठवून, आपले कमाविस लेहून, शहराआसपास बागांतील व गांवांतील झाडांचा तलाश करून, अथवा जेथें असतील त्या परगणियांत आढ़ळांनीं मनास आणून चिंचोक्यांसमेत सगळ्याच चिंचा दोन बैल भरून आणवून जरूर हुजूर पाठविणें. तुह्मी आपले बागांत सदरहु चिंच लाविली असेल, तरी पाहून, तिच्या चिंचा उतरून लिहिल्याप्रमाणें पाठविणें. सारांश हेंच की, तुह्मी प्रेत्नपूर्वक जेथें असेल तेथून आणवाल, यास्तव लिहिलें आहे. तरी नगराजवळ आहेत तेथें अथवा हर कोठे असेल तेथें माणूस पाठवून आणून हुजूर पाठविणें.

आपलें वरत्त लिहिनं. चिच ताबडी तुमच्या बागांत असेल ती पाठवनं. आनखी ( तलास ) करून पाठवनं. औरंगाबाजेहून आननं. गधिलीच्या बागांत आहेत, आन नगरच्या बागांत आहेत. चिचोकसहित आननं. बहुत काय लिहिनं ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries