मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

॥ श्री ।।

पु ८३

शक १६६८ आश्विन शुद्ध ३

० श्री ॅ
राजाशाहू नरपति हर्ष-
निधान बाळाजी बाजी-
राव मुख्य प्रधान.

राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासीः--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य --स्ने॥

बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद. सुमासबा अर्बैन मया व अलफ. तुह्मीं, राजश्री महादोबा यांस पत्र लिहिलें, त्यांत बंदिवानाचे मुक्ततेविसीं लिहिलें, तें कळलें. ऐशास, येविसीं लिहिणें तें राजश्री अंताजी नारायण यांस लिहिलें आहे. तुह्मीं आपला कारकून त्यांजपाशी पाठवून देणें. बंदिवानाचा झाडा काढून लिहितील, तदनरूप मुक्त करणें तें केली जातील. जाणिजे. छ २ रमजान.  * बहुत काय लिहिणें ?

(लेखन सीमा)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries