मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ३७८ ]

श्री शके १६७९ माघ.

विनंती ऐसीजे : दिल्लीहून वर्तमान श्रीमंत स्वामीचे मौलारामाचे पत्रजम्मूचे बातमीचें आलें कीं, अबदाली काबुलेस आहे. त्याचा बक्षी ज्याहानखां बालखचे पातशाहावर गेला होता. तो सिकस्त खाऊन आला. कांहीं फौजही किलमाचची बारा चौदा हजार अबदाल्यानें ठेऊन आणली होती. यांसी करार कीं, माहबमाह दरमाह देत जावा. दोन च्यार महिने चढले. यांनी तमाजा केला. त्यांनी देऊ दिलाऊं जाबसाल केला. ते उठून जाऊ लागले. त्याचे समजाविशीस शाहालीखान गेला. तेसमयीं वजिरास सांगितले कीं लुटून घेणें. त्यासी यांसी लढाई जाली. वजीर सिकस्त खाऊन आले. *** चालले, गेले. कांहींक फौज अटक उतरोन या तीरास आली होती. सिखासी लढाई जाली. सिखांनी मारून वाटेस लाविलें. लठ्ठीस अबदाल्याच्या मालिकचा आला की, बाराहजार फौजनसीं येऊन शामील होणें. लठ्ठीनें जाब लिहिला की अटकेवर खासी स्वारी आलियावर येऊन मुलाजमत करून. याप्रमाणें वर्तमान जंमूस आलें, ह्मणून दिल्लीचे बातमीवाल्यानें श्रीमंत स्वामीस लिहिलें. बल्की दिलीहून एका उमद्याचेही लिहिलें याप्रमाणेंच आलें. सेवेसी कळावें. हे विज्ञाप्ति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries