मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ४८० ]

श्री

पु॥ श्रीमंत राजश्री ------------ सुभेदारसाहेब
गोसावी यासी:-

विज्ञप्ति ऐसीजे. नजीबखान सरहदेस अगोघरच गेला होता. त्यास, शाहा सडेस्वारीनशी शिखामागें आला. त्याच वेळेस नजीबखान सडेस्वारीनशी शाहाचे मुलाजमतीस गेला. मुलाजमत केली. पाहावें; काय ठराव ठरेल तो. मागाहून विनंति लिहूं. आह्मांस तीन चार पत्रें शाहाचीं बोलावयासी आली; व जिनतमहल, व याकुबअलीखान यासी, व तीर्थरूप राजश्री बापूजी महादेव यासी वरचेवर आलीं कीं, फलाणीयासी पाठविणें. तो विस्तार पूर्वी साहेबास विनंति लिहिली आहे. त्यास आज्ञेशिवाय न जावें, यास्तव दोन महिने मार्ग लक्षिला. विनंति पत्रोतरी आज्ञा आली न कळे. मार्गामुळें पत्रें न पावलीं किंवा दिरंगानें पावली ? पूर्वी पत्रोत्तरीं आज्ञी आली की, ते प्रांतीं स्वामी आलियावर तुह्मांस लिहूं, तेव्हां याकुबअलीखानास घेऊन येणें. त्यास, अबदालचि ++++ सत्वर साहेबाकडे जाणें. त्यास घेऊन न येऊं तरी तो अजूर्दा; व यावें तर आज्ञा नाही. यास्तव त्यांस येथें लावून ठेवून त्याचा एक भला मनुष्य घेऊन येत होतों. येथून एक मजल मथुरेकडे निघालों इतकियांत, वर्तमान ऐकिलें की, आपण माघारा फिरून उजिनीस गेलेत. मार्ग दुस्तर जाला. यास्तव लाइलाज राहिलों. तों शाहाची पत्रें वरचेवर आली कीं, सत्वर येणें. आज्ञेशिवाय न जावें यास्तव पाच सात पत्रें सेवेसी लिहिलीं, व दोन महिने उत्तराची मार्गप्रतीक्षा केली; परंतु उत्तर न आलें. तिकडे जावे तर इकडील हिंदुस्थानी पातशाहासुद्धां बेइमान जाले. त्याजकडे गेल्याने त्यासी व साहेबासी एकोपियाची शोहरत होईल व हे बेइमान बेइमानी करणार नाहींत व आपण या पातशाहास पातशाहा केले असतां बदनियत जाली. येविशईहि तिकडील बनेल तर आपले करावे. तेहि बोलावितात. काय मानस ? व किती फौज ? व काय विचार मनास आणून आपणाकडे. यावया + + + + + + + + + + + रवाना जालों तो शामलीस पावलों. पुढेंहि साहेबाचे प्रतापें जातों. शाहास व अश्रफुल उमरा शाहाबलाखान यासी पत्रें शिष्टाचाराचीं पाठविणार आपण समर्थ आहेत. सुरक्षित पावून हजर येऊन श्रीकृपेनें साहेबांचे दर्शण घेऊं तो सुदिन ! खर्चावेचाविषयी पूर्वी विनति लिहिली ते मान्य करून कृपा करणार आपण समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries