मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१ श्रीमंतांचे वाड्याभोंवते पलटचे लोक होते ते उठोन गेले.छ. १ रमजान सरकारचे लोक आबा काळे यांचे निजबतीचे पलटणचे चौकी पहा-यास बसविले.

२ दौलतराव शिंद याणीं सखाराम घाडगे सरजेराव यांचे कन्येशीं लग्न केलें नांव बायजाबाई ठेविलें. समारंभ मोठा झाला फाल्गुनमास. व बाळाबाई चितोळे यांची कन्या यशवंतरावदाभाडे सेनापति यास दिली. लग्न मार्गशीर्षमाशी झालें. ।

३ नानाचे निसबतीची मंडळी वाड्यांत कैदेंत होतीं त्यापैकीं त्रिंबकराव परचुरे याणीं बाळोजी कुंजर याचे विद्यमानें आपले जवळचें सारें द्रव्य सरकारांत समजाऊन त्यापैकीं तीन लक्ष रुपये शिंद्याकडे रोकड होते ते दिले; आणि श्रीमंताचा निरोप घेऊन फाल्गुन व॥ ६ गुरुवारीं छ. १९ मनाजी काशीयात्रेस गेले. खामगावचे अन्नछत्र त्याचे होते त्याची नेमणूक चालवावी व कल्याणपैकीं त्याचे हुजूरचे दप्तरचे आसामी बाबचे दोन हजार रुपये दरसाल त्रिंबकराव जिवंत आहे तो काशीस पाठवावें. याचा करार श्रीमंतांनीं करून सनदा दिल्या. नानास कैद केल्यावर अमृतरावसाहेब याणीं कारभार करावा असें त्याचें मनांत होतें. परंतु दौलतराव शिंदे याचें लक्ष बाजीरावसाहेब यांजकडे व बाजीरावसाहेब यांचें मनांत रावसाहेब याणीं मुखत्यारी करावी असें नव्हते. याजमुळें रावसाहेब यांचें मनांत वांकडेपणा येऊन जुन्नराजवळ गणपतिचें दर्शनास जावयाचे निमित्तानें बाहेर डे-यास फाल्गुन शुद्ध ११ छ. १९ रमजानी जाऊन राहिले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries