मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. ९ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि. अत्मीकांनीं सांगितले कीं मध्यस्त आपले घरीं कोणा येकासीं बोलत होते कीं हजरतीचा निरोप दो महिन्यांचा घेऊन पुण्यास जावयाचें: त्या ग्रहस्तानें पुसिलें कीं मग हजरतीपासीं कोण आहे ? आणि जावयाचें प्रयोजन कोणतें ? याचें उत्तर मध्यस्तांनीं केलें कीं पटणचे मोहिमेस गेलों ते वेळेस हजरतीपासीं आपले नियावतीवर गफुरजंग याचे पुत्रास ठेविलें, त्यास ठेऊन पुणियास जावें. मदारुलमहाम याचे मनांत संशये आले ते काढून दोन्हीं सरकारची ऐक्यता करून लवकर यावें असें मनांत आहे. याप्रमाणें बोलण्याचा उद्गार निघाला. पुढें पहावें काय ठरतें? जाहीरदारींत तर ऐसें आहे. मनांतील बेत काय असेल तो असो ! त्यास असाच विचार ठरविल्यास मध्यस्ताचे बोलण्यांत येईल. ही गोष्ट झांकून रहावयाची नाहीं. काय ठरतें हें समजेल. र॥ छ २२ मोहरम, हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries