मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७१५.

विनंती विज्ञापना मध्यस्तास आम्हीं विच्यारिलें कीं “ करनुल संवस्थानचा बंदोबस्त इभ्राइमखान यांनीं करावा, येसे पेषजी ठरलें असतां सांप्रत अलफखान यांजकडे बाहाली जाल्याचें यैकतो. याचें कारण काय? आलफखानाकडोने रणदुलाखान येथें आले; आपल्याकडील नजराणा वगैरे जाबसाल ठरलाच असेल, श्रीमंतांचे सरकारचा जाबसाल होणें. यास्तव करनुल प्रकरणी बंदोबस्त कोणे प्रकारचा ठरला ? “ याप्रो बोलल्यावरून मध्यस्तांनी बोलण्यांत आणिलें कीं “ टिपुकडील पेशकषीचे येवजाकारतां करनुलकरास तगादा लागला आहे. येविसीं लाडसाहेबांस लिहिलें होतें. परंतु लाडाचें म्हणणें कीं पेशकसीचा जाबसाल परभारें टिपुसुलतान करनुलक रांसी समजोन घेतील. आपल्याकडोन तोंपर्यत करनुल तालुकियांत दखल होउं नये, असें आहे. त्याजवरून तूर्त इबराहीमखान यांची पास करून तालुक्यांत हांगामा करणें सला नाहीं म्हणोन बिलफैल अलफखानाकडे तालुका आहे तसाच असावा; पुढें प्रसंगानरूप होणें तसें होईल. हा विचार समजोन आलफखानाकडेच बाहाली ठरली. इबराहमिखान यांस साठ हजार रु, याची जागीर येक तालुका द्यावा, ऐसे रणदुल्लाखान यांसी बोलण्यांत आले. मग साठ हाजाराचा वसुली तालुका देतील अगर पांच, हजार रु माहावारी द्यावी. दोन्हीतून येक ठरेल बंदगान आली याचे सरकारचे नजरेचे बोलणें जालें; परंतु मुलतवी आहे. सबब कीं रणदुलाखान यांचें बोलणें टिपुकडील पेषकसीचा तगादा मवकुफ करवावा. यावरून नजराणा वगैरे जाबसाल तूर्त मोहगम आहे. दोन्हीही सरकारचे जाबसाल ठरले पाहिजेत. " रणदुलाखान तुम्हांकडे आले होते कीं नाहीं म्हणोन मजला विच्यारिलें मी सांगितले, “ अद्याप आम्हांकडे नाहींत '' मध्यस्त बोलिले “ते तुम्हांकडे येतील, बोलतील, टिपुकडील पेषकसीचा तगादा भारी, याचा बंदोबस्त जरूर. यास्तव तुम्हीं सरकारांत लिहून - डबहादूर यांस इकडील व तिकडील दुतर्फा पत्रें जाऊन बंदोबस्त व्हावा. करनल संस्थान इकडील व तिकडील सालाबाद पेषकषीचे याजकरिता येयाची एहतियात करणें आवल, " म्हणोन बोंलले. रा छ, १५ मोहरम हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries