हे तजवीज तुम्हास मानते काय, म्हणून विच्यारिल्यास त्यांनी उत्तर दिल्हेजे । महाराजांनी केली तजवीज इतुकी हीं खरीच । प्रस्तूत महाराजांनी योजिले कार्य हीं करावेंच । ईश्वर हीं साह्य होईल। म्हणून त्यांनी जबाब दिल्हा। त्यावरून महाराज शिवाजी राजे फौजेची संजोगणीत्व यवनावरी राजकारणास प्रवर्तले । तोविध प्रथम अम्ही दोघानीहीं सर्व प्रयास केल्याहीं यांचा यत्न चालना । त्या ठिकाणी राहून मग वरकड तजवीजेस प्रवर्तावें म्हणून, स्थळपरामर्श केल्या ठांई,पश्चिम प्रदेशी विराट देशांत साध पर्वताचे घाटाखाले पश्चिमसमुद्रतीरासमीप देश लोह पर्वत प्रांती प्रतापगडा समीप जयवल्ली नगर आहे, ते स्थळ बहुत, कुबल तेथे कोणाचाहीं लाग नाहीं । वाटेस घाटहीं कुबल करितां ते स्थळ आक्रमावें तरी वाटेस बहूत राजे आहेत । ते राजे समग्र अल्लियदल्शाहास तोफा देणार।त्या समग्रास मारूनच ते स्थळ साधावें म्हणावयाचा दृढनिश्चय करून यास प्रथम सिंहगड साधिला तो शाहाजी राजाचें मोकळीकेस्तव अल्लियदल्शहास सोडिला होता,तोपरतून घेऊन त्या सिंव्हगडास आदिकरून अपल गड किल्यांत समग्र सामान रस्त व फौज हे समग्र भरून बंदोबस्त करून अपणा बरोबरी घ्यावें । याच.. फौज धारकरी, चांगला राऊत, निवडून आपल्या मनास पाहिजे तितु.... सेना पदचारीच विशेष घेऊन, बरोबरी कोणती रस्तही माघून या ह्मणावयाची अपेक्षा न धरावया जागी सुलभांत घेऊन, प्रयाण सि.... करून, अनेक द्रव्य दक्षिणायुक्त यात्रादान करून, देवता प्रार्थना कु.... देवताराधना विशेष करून प्रयाणसमयीं कुलदेवता प्रत्यक्ष होउन स्वप्नांत जयप्रद अैसा दृष्टांतही दिल्हा । तोही पाहून जय भेरी ठोकूदल् समुहूर्ते विजयदशमीचें मुहूर्तानें कूच करून चालिले। विजयादशमीसणासं कूच केलें म्हणिजे भोंसल वंशांत जयप्रद दिवस तोच, म्हणून परंपरा चालले । याकरितां उत्तम शकुन हीं जाहले । त्या शकून सुमुहुर्तानिशी कूच करून जाते वेळेस, आरंभापासून जयवल्ली नगर पावेतो, ही वाटेस निबिडघन निबिड पर्वत संधीत वनांतहीं अनेक देशाधिपती,

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries