मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

लेखांक १४४.

१६९८ चैत्र शुद्ध ६.

निदानीचे पक्ष लिहिले आहेत. वाचून प्रसंगानुरूप बोलणें. आह्मांस तर भय प्राप्त जाहले कीं, याच्यानें किमपि हुकूम अपटणाचा मोडवत नाहीं. पुढें हे तरी परस्वाधीन. काय करतील न कळे. तेव्हां आबरूवर आलें, त्यापेक्षां प्राण जातील तरी बरें. आबरू शत्रूचें हाती न जावी. वरकड जें दैवो असेल तसेच खाऊन राहूं. सर्वस्व बुडालों.आता इतकीच इच्छा राहिली. लौकर बोलून पक्के करणें. त्याची हिंम्मत काहींच नसली तरी भेट घेऊन, लागलेंच खर्चाची काही बेगमी करून, होनावराकडे हैदराकडे पावते करावे. बोलून ठेवणे. रूबरूही येविसीं बोलणें होईलच. जाणिजे. छ ४ सफर.

(लेखनवधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries