मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १७४.


१६९८ अधिक भाद्रपद शुद्ध १२.

पु।। राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि :-
सु।। सबा सबैन मया व अलफ. खासा स्वारी छत १० रजबीं, मौजे उदवाडा त॥ बादलापारडी येथून कूच होऊन अर्जुनगडानजीक कोसावर मुकामास आली. किल्ल्यांत फत्तेसिंग हवालदार होता तो खालीं उतरोन रुजूं जाहला याजमुळें त्यासच किल्ले मजकूर काईम करून ठेविला व किल्ल्यावर हुजूरचे लोक व कारकून ठेऊन बंदोबस्त केला; दवणकर जमियतसुद्धां भेटले. याजबराबर तोफाही आहेत. या दबावांनी इंद्रगड वगैरे जे बाळ त्यास आहेत त्यांवर शह टाकून हस्तगत होतील ते करीतच असो. गोव्यास पत्रें मुख्य फिरंग्यास व राजश्री जिवाजी विश्राम यास लिहून तुह्मांकडे पाठविलीं आहेत. तरी ही पत्रें जलद फिरंगियाचा कोठीवाला तेथें आहे याजवळून रवाना करवणें अगर हरतर्तुदीनें जसी तुह्मांस सोई पडेल तसी पाठवणें. तेथून लौकर सरंजाम आला पाहिजे. वरकड सविस्तर पु॥ पत्रावरून कळेल. जाणिजे. छ ११ माहे. रजब. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries