मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १७७.


१६९८ अधिक भाद्रपद वद्य ९.

राजश्री लक्ष्मण आपाजी गो।। यांसि :-

सु॥ सबा सबैन मया व अलफ. दमणेनजीक आल्यानंतर अर्जुनगड-इंद्रगड हस्तगत जाले. त्यास दमणकर फिरंगियाचें सूत्र सरकारांत हे दोन्हीं किल्ले द्यावे ह्मणजे दोनशें गोरा व तीनशें पागडीवाला व आठ दहा तोफा लढाईचा सरंजाम देतों ह्मणून आलें. त्यास इतका सरंजाम तूर्त खासा स्वारीसमागमें आल्यानें मोठीच इभ्रत पडोन सरकारचीही जमीयत मिळेल. ती व हा सरंजाम इतक्यानसीं दहा हजार फौजेसी लढाई द्यावयास उपयागे पडेल अशी अनुकूलता घडत आहे. परंतु आगरेजाचा आह्मांस पक्का भरोसा, क्षेपनिक्षेप कुमक करितील असा असतां मग फिरंग्याकडे काय स॥ गुंतावें ! ह्मणून किल्ले न दिल्हे व त्याचा सरंजाम कुमकेस न घेतला. तूर्त आपलेच बळावर आहों. डाहाणू-तारापूरकर तेहि लौकरच येतील. श्रीकृपेनें चिंता तरी नाहीं. कदाचित फितुरियांकडील पेंच अनावरसा दिसों लागल्यास असरा आंगरेजाचेच स्थलाचा आहे. हा भावही जनरालासी सविस्तर बोलावयाचे अन्वयानें प्रसंग समजोन स्थलें संरक्षण करणें. सुरतेहून निघालों त्याचें संकट जनरालास किती घालावें ? ते आमचे दोस्त. त्यांचें नुकसान सरकारांत प्रशस्त नसे. दुसरें सुरतेस बसोन मसलतही दबलीसी दिसती, सबब बाहेर मुलकांत आलों. आतां फिरंगी वगैरे सर्वांशीं राजकारणें करणेंच प्राप्त. होतां होतील खरी. परंतु मुख्य भरोसाव पेंच दिसो लागला तरी आसरा आंग्रेजाचाच असे. कंपनीचें स्थल फार दूर टाकून जात नसों. हे प्रकार तपसीले- करून बोलावे. र॥ छ २२ रजब. गोव्यास पत्रें रवाना करण्याकरितां तुह्मांकडे मागेच पाठविलीं आहेत. तीं गोव्यास पावती करणें. जिवाजी विश्राम यांचे विद्यमानें गोवेवाल्यास पोहतच तें करणें. छ मार.

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries