मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक २०.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पुरवणी श्रीमंत राजश्री नाना स्वामींचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : राजश्री बाळाजी गोविंद झांसीकर याणीं तु चे गांवाविशई ऐवजाविसीं जाबसाल केले त्याचा तपसील लिहिला तो सविस्तर समजला. ऐसियासी, येविसी, त्यांचे कारकुनास येथून निक्षून ताकीद केली, ह्मणोन पत्रीं लिहिलें. त्यास, सरकारांत हमेशा विनंतिपत्रें लिहितों. त्यांत एक पुरवणी नाइलाजास्तव आपले नादारीची लिहितच आहे, त्याची उत्तरें याप्रों त्यास ताकीद केल्याचीं येतात. परंतु कांहींही कमाविसदारांस ताकीद प्रत्ययास येत नाहीं. आणि आह्मीं येथें परदरबारीं पूर्वींपासून सरकारचा नांव-लौकिकनक्ष त्याप्रमाणें राहिलें पाहिजे. खांद्यावर धोत्र घालून राहिल्यास रूप नाहीं व वावगा खर्चही नाहीं. परंतु बाह्य मात्र नीट राखणें प्राप्त, नेमणुकीप्रों खर्च ठेविला यास्तव कर्जदारी जाली. स्वामींनी जहागीर बुंदेलखंडांत लावून दिधली. ते बाळाजी गोविंद याणीं उरई परगणा कालपीसमीप दहा कोस आहे तेथें विसा हजारांची कमाल-जमेची चाळीस वर्षें जाली. जे गांव उज्याड पडले होते ते लावून दिल्हे. त्याची, आज पांच वर्षें जालीं, लावणी-जुपणीकरितां पांच सात हजार काचे बनारसचे जमेवर आले ते रु।। दिल्लीचे बारा आणे होतात. या प्रकारें वसूल होत होता. त्यास, हालीं कालपींत इंग्रजांचा अंमल जाला. त्याजमुळें आमचेही गांवची बद-अमली होवून कपर्दिक यंदां पदरीं पडली नाहीं. व झांसीकरांनीं नगदी पांच हजार दो वर्षांपासून बंद करून गांव लावून दिल्हे होते तेही त्याणीं जप्त केले. स्वामींनी फाजलापों उभयतां सरदारांवर निमे वरात दिल्ही कीं हरएक ऐवजीं रुपये देणें. त्यास, सरदारांनीं जेपुरावर पुढें वरात दिल्ही व निमे सरकारांतून जाटावर वरात दिल्ही व निमे सरकारांतून जाटावर वरात दिल्ही. दोन जागा कमपेश तीस तीस हजारांच्या वराता फाजलापों व तलबाप्रों वीस हजार रुपये जाटावर वरात दिल्ही. येकूण कमपेश ऐशीं हजार रुपये वराता. ते दोनीं स्थलें नजबखानाकडे गेलीं. याप्रों अमदानीचा प्रकार आहे. तेव्हां आम्हीं काय करावें ? कर्ज कोठपावेतों घ्यावें? कर्जही कोणी देत नाहीं. बाळाजी गोविंद याजकडोन, झांसीकरांकडशेन बुंदेलखंडचे जहागिरीकडोन व फाजलाचे वरातीप्रों कोठूनही रुपये आल्यास येथें मागील देणें लोकांचें भारी जालें त्याप्रों वीस हजार तूर्त देणें जरूर आहे तें वारून सेवेसी येऊं. पुढें नित्यानीं पोटास पाहिजे व कर्जदाराचें तगादे सरवत याचा तपसील पत्रीं कोठवर लिहावा ? स्वामी धणी जर या समयासी आपण खबर घेत नाहीं, तर प्राणासी गांठ पडली. येथून निघोन स्वामीपासीं येणें व येथेंही रहाणे कठिण जालें. या प्रकारची अवस्था येऊन लागली. तारणार स्वामीच आहेत. दुसरा आश्रय परमेश्वराचा किंवा स्वामीचा आहे. यास्तव निखालस फडणिसी दप्तरची वसुली जमेचे गांव देणें ह्मणून सनद पा। किंवा गांववसुली जमेचे हातास आले तर कर्ज तऱ्ही मिळेल व स्वामीस लिहिणें न पडे. सरकारांतून ऐवज बाकीचा येणें. त्याची वरात हरकसी जागा करून द्यावी कीं, रु।। हातास येऊन कर्जदारापासून सुटका होय ते करणार स्वामी समर्थ आहेत. याद अलाहिदा पा। आहे. त्याजवरून श्रुत होईल. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होई तो सुदिन. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries