मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक २१.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामींचे सेवेसी : -
विनंतिपत्रीं आज्ञा कीं, हैदर-अल्ली- खान-बहादूर याजकडील मार पेशजी लिहिण्यांत आलाच आहे. इंग्रजांस जरब त्यांनीं फार दिली. हालीं गंटूर देवाणापाटण ह्मणोन बंदर-किनारा जागा अडचणीची आहे, तेथें जमीयतसुद्धां करनेल कोट आहे. हैदरखान यांनीं सभोंवता माहसरा दिल्हा आहे. बंदी केली फरासीसही. सरंजाम पोख्त जलद येणार. फरासिसाचें राजकारण खानाशीं पक्कें जालें आहे. सरकारांतही फरासिसांचा शिलशिला अव्वलीपासून आहे. याप्रों तिकडील वर्तमान आहे. तुह्मीं हुजुरांत अर्ज करावा व नजबखान यांसही सांगावें. त्याचेही परभारें अखबारेवरून वर्तमान येतच असेल, ह्मणून लिहिलें. त्यास आज्ञेप्रों पातशहास व नजबखानास हें वृत्त श्रवण केलें. ऐकून बोलिले कीं, या दिवसांत हैदरअल्लीखानें याजपाशीं फौजेचा व पैक्याचा सरंजाम पोख्त आहे, त्यावरून सर्व गोष्टी अमलांत येत्यात. आह्मी बोलिलों कीं, सर्व गोष्टी मेहनतीच्या व जुरतीच्या आहेत, पूर्वीपासून जो कोण्ही जुरत मेहनत करीत आला आहे त्यास मुलुकास व खजान्यास व फौजेस कमी नाहीं. म्हणून बोलिलो. त्याचे उत्तर हेंच केलें कीं, सत्य आहे. याप्रों हरयेक समई उत्तेजन देतों. आतां बादबरसात पातशहासुद्धां बाहेर निघतो, ह्मणून आम्हासी करार करितात, तोफखाना वगैरे सरंजामही तयार करितात व कुंजपुरियाकडील फौजही रिकामी करावया तरतूद केली आहे. परंतु अंमलात येऊन सरकारचे मसलतीस उपयोगी पडत, याच विचारांत रात्रंदिवस आहेत अनुभवास येईल ते मागावून विनंति लि।।. कृपा केली पाहिजे. दर्शन होय तो सुदिन. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries