मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक २७.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : रा। बाळाजी गोविंद यांस सरकारचीं ताकीदपत्रें परभारां पाठविलीं आहेत. त्यास, मारनिल्हे तुह्मांस ऐवज सत्वर क्षेप-निक्षेप देतील. म्हणून पत्रीं आज्ञा. त्यास, पेशजी ताकीदपत्र सरकारचे मारनिल्हेचे नांवें आलें कीं, दाहजार रु।। जागिरीचे कमतीचे ऐवजीं देणें. त्यास ताकीदपत्र व दोन कारकून व माणसें पाठविलीं. त्यास च्यार महिने पदरचे खाऊन त्याजपाशीं राहिले. पत्राचें उत्तर मिळणें दूर. संभूत जाबदेखील न देत. निदानीं उत्तर दिल्हें कीं, आह्मापासीं खर्च भारी, मुलुकांत गढेमंडळेकराचा दंगा, याजकरितां पैका नाहीं. म्हणून उत्तर देऊन मार्गस्थ कारकून व माणसें रिकामीं आह्मांकडे पाठविलीं. त्यास फौजेंचा खर्च म्हणावा तर रा। बाळाजीपंत श्रीनगरी तीनसें पागेचे रावतानिसीं आहेत व गंगाधरपंत दोनशें स्वार पागेचे व दोनशें शिलेदार मिळून चौशा रावतांनिसीं कोचकनारप्रांतीं आहेत. आपले आपले ठिकाणीं स्वस्थ आहेत. या दिवसांत आपले ठिकाणीं हे आपल्यास चवघ्या राज्यारजवाडयाप्रमाणें जाणतात. सरकारची आज्ञा यांचे ध्यानांत नाहीं. कोण्ही सरकारचे तर्फेने जबरदस्त होवून येईल त्यासी बनेल त्या रीतीनें रजाबंदी पैका देऊन करूं, ह्मणून विलग बोलणीं नानाप्रकारें बोलून झांसीकर व हे एक विच्यारें आहेत. या उभययतांपासीं फौज नाहीं. उगेच कमाविसदारी बहाणे मात्र करून आपले ठिकाणीं आहेत. रा। महादजी शिंदे यांचे भेटीस देखील न गेले. पुढें जाणार आहेत. स्वामींनीं कृपा करून विसा हजारांची जागीर बुंदेलखंडांत देविली, ते मारनिल्हेना कमाल निम्मेची लावून दिधली. त्याप्रों आतां पांच हजार रुपये दिल्लीचे पदरीं पडतात. आणि येथें परदरबारीं राहणें खर्च भारी. रुपया खर्चास पुरत नाहीं. याजकरितां येथें पंधरावीस हजार कर्ज लोकांचें देणें जाहलें आहे. नित्यानीं पोटाचें संकट येऊन पडतें. कर्जदाराचे तगादे. या गोष्टीचा तपशील पत्रीं कोठवर लिहावा ? स्वामीचे प्रतापें व पुण्येंकरून आबरु व प्राण वांचले. नाहीं तर, ईश्वरें नेमिलें असेल तें घडेल. या समयांत सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. पूर्वी सेवेसी विनंति पैदरपे लिहिली कीं, बाळाजी गोविंद रु।। आह्मांस देत नाहीं, हुजूर घेऊन सेवकांस पाठवाल तर जीव आबरु राहील, स्वामींनी त्यास ताकीद केली ते न मानीत, यास उपाय तेवेंत विनंति लिहितो. इतके आयास येऊन लिहावयास कारण, अवस्था परम कठिण जाली आहे. बाह्य आजपावेतों आपले कृपेनें जतन केला. पुढें कृपा करून संरक्षण करणार श्रीकृपेनें स्वामी समर्थ आहेत. नाइलाजास्तव विनंति लिहिली मान्य केली पाहिजे. येथून राजश्री महादजी शिंदे यांजपावेतोंही जावयास कर्जदाराचे ताडातोडीमुळें न बने. नित्याची संभूत चालवणें व ठरणें. उत्तरीं सनाथ कराल तोंवर ईश्वरें काय नेमिलें असेल ते होईल. श्रुत होय. स्वामीसेवेंत जीव शरीर अर्पिलें. अबरु रक्षणार मायबाप आपण दया केली पाहिजे. दर्शनलाभ घडेल तो सुदिन. हे विनंति. वरकड वृत्त वेदमूर्ति राजश्री गोविंद भटजीचे पत्रावरून श्रुत होईल. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries