मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक २८.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे: पूर्वी याजपासून कौलनामा लिहून घेतला आहे त्याची नक्कल व हालीं याणीं याद लिहून काढली आहे त्याची नकल, ऐशा दोनी नकला हिंदवी करून पो। आहेत, त्याजवरून ध्यानांत येईल. तात्पर्य, पहिले याजपासून लिहून घेतलें. आहे त्या कौलनाम्यावरून अंतर्वेद सरकारचे पदरीं पूर्ववतप्रमाणें पडती. याजकरितां यांचा जीव इच्छित नाहीं कीं, याप्रोंच दुसरा कौलनामा राजश्री महादजी शिंदे यांचे नांवें लिहून घ्यावा. प्रथम कौलनामा लिहून दिल्हा आहे, त्यांत शफत लिहून दिली आहे, तीस अंतर पडोन बेइमानी पदरीं पडते. याजकरितां इंग्रजांसी मिळूं सकत नाहीं. आणि आम्ही नित्यानीं तगादा करितों कीं, पाटीलबावा समीप आले होते, तुह्मींच चालून सामील व्हावें किंवा आपली फौज त्यांचे सामील पा।. त्यास, ह्या गोष्टी ऐकोन टाळाटाळ करितात. त्याचें कारण हेंच कीं इंग्रेजांसी भितात. खोळून त्यासी बिघाड करूं सकत नाहींत. अंतस्थ आह्मासी बोलणीं मात्र बोलून आजपावेतों बोलत गेले. व सरकारातही लिहीत गेले. त्याप्रोंच आतां इकडून ठेविलें आहे. याचें मानस कीं, इंग्रजांचीं पलटणें पाटीलबावांनीं मारून अंतर्वेदीत उतरलेस व सरकाराची फौज व सरदार जबरदस्त पडलेस जाणतील तेव्हां सामील होतील आणि पेशजी कौलनामा लिहून दिला आहे त्याजवरच कायम रहातील. जोंपावेतों ग्वालेरप्रांतीं इंग्रेज आहेत त्याचें पारपत्य जहालियाखेरीज हे दिल्लीबाहेर निघत नाहींसें दिसतें. पहिलें वचन गुंतलें आहे, याजकरितां इंग्रजांसही सामील होत नाहींत, दोहींकडे स्नेह ठेवितात. परंतु अंत:करणपूर्वक इंग्रेजांचे पारपत्य व्हावें, म्हणोन कायावाच्यामनेंकरून याचें बोलणें शफतपूर्वक आहे. व पूर्वी कौलनाम्याप्रमाणें अंतर्वेदींतील माहाल मुलूक दिल्लीसमीप आहे तो जातो ह्मणून आतां आशा उत्पन्न जाली आहे. व तूर्त यांची फौज शिखाकडेही अटकली आहे. याजकरितां दुसरेकडे खास करूं सकत नाहींत. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries