मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ५०.

१७०७ अधिक चैत्र वद्य ५.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
पो गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक सा। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ १९ राबल जाणून स्वानंदलेखन-आज्ञा करीत गेले पो. विशेष. इकडील वर्तमान पेशजी छ १७ राखरीं विनंतिपत्रें पाठविलीं तीं पाऊन विस्तारवृत्त कळलेंच असेल. हाली वर्तमान तरी, एकमास जाला, राजश्री पाटीलबावांनी रायाजी पायास आग्रियाचा किल्ला घ्यावा, ह्मणून डिगेचे मुकामीहून रवाना केलें होतें. त्यास, हे आग्रियास जाऊन, अंमल करून, किल्यास, मोर्चे लाविले होते. त्यास, छ ११ मिनहपावेतों किल्ला जुंजला. निदान भवानसिंग वगैरे पलटणवाले व गोलंदाज किल्ल्यांत होते ते फोडून छ १२ मिनहूस येऊन रायाजी पाटील यांस भेटून मागील तलब द्यावी आणि पुढें आमचे भायबंदीचा बंदोबस्त करून द्यावा ह्मणोन बोलोन, परस्पर वचन प्रमाण होऊन, छ १५ मेनहूस आग्रियाचे किल्यांत राजश्री पाटीलबावाकडून रा। धलपतराव ग्रामें गृहस्थ दाखल जाला. सुज्यादीनखान याजकडील आपला लोक सर्व किल्याबाहेर निघोन जुमामहजदीपासी येऊन डेरा केला आहे. किल्यांत राजश्री पाटीलबावाकडील बंदोबस्त जाला. व सुज्यादीनखानाच्याही भेटीचा ठराव राणेखानभाई व रायाजी पा। यांचे वि।। ठरले आहे कीं, मारनिल्हेसही भयदाब लावून देऊन त्याचेही चालवावें, ह्मणोन ठरले आहे. पुढे एक विच्यार आहे कीं, श्रीयमुना उतरून प्रात:काळीं समीप रामगड, अलीकडे नजबखानानें अलिगड ह्मणोन नांव ठेविलेंआहे, तेथे जाऊन, तोही किल्ला खाली करून, आपला अंमल करून, पातशाहासुद्धां दिल्लीस जावें. हा येक विच्यार आहे. परंतु पातशाहा दिल्ली जावयाची जलदी बहुत करितात. याजकरितां दुसरा विच्यार आहे कीं, अलिगडाकडे येक सरदार मातबर व फौज पलटण समागमें देऊन त्यास तिकडे रवाना करावें व पातशाहासहित आपण दिल्लीस जावें. असे दोन विच्यार ठरले आहेत. पुढे प्रत्ययास येईल तो विच्यार लिहूं. वरकड बारीक-मोठें वर्तमान राज्याच्या वाक्याच्या फर्दापातशहाच्या दरबारच्या व राजश्री पाटीलबावाच्या व वजिराचे दरबारच्या व कलकत्त्याकडील वर्तमान सविस्तर फारसी फर्दावरून कळेल. बहुत काय लिहिणे ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries