मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ५१.

१७०७ आषाढें वद्य ९.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्र आज्ञा की :- तयमूरशाहा अबदालीकडील राजकारण मोठें आहे. याजकरितां तुह्मी सिलसिला लावून ठेवणें. उपयोगी पडेल. ह्मणून आज्ञा. त्यास, श्रीमंत स्वामीचे अर्जी आली ते स्वामीनीं आपले पत्र व सरकारचे पत्र खलिते गुलाम महमदखान यास जाब पाठविले होते ते त्यांस दिल्हे. व आह्मीही आपली अर्जी त्याकडून पहिले तीर्थरूपाचे नांवे पत्रें आलीं होती दोन, त्यांचे जाब लिहून देऊन रवाना केली आहेत. उत्तरें आलियावर सेवेसी पाठवून देऊं. या दिवसांत तयमूरशाहाकडील वकील पातशाहापासी स्नेह शिष्टाचार करावयास व येथील यांचे दौलतीचा रंग पहावयास तेथून रवाना केला आहे. तो अद्यापि दिल्लीस आला नाहीं. पुढल्यासालीं त्यांचे मानस दिल्लीकडे स्वारी करावयाचें आहे, ह्मणून श्रवणांत आलें. ते विनंति लिहिली आहे. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries