मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

लेखांक ५६.

खान याजसामगमें गेले आहेत. तिकडून सीखही भारी जमावानीसीं मुकाबल्यास आले आहेत. नित्यानीं गोळा-गोळीचें जुंज होतें. परंतु सीखाचा गलबा भारी जाणोन, याजपासीं दिल्लींत फौज व पलटणें व तोफखाना आहे त्यांतून आणिक सरंजाम त्याकडे स्वार व पलटणें रा। करितात. आह्मी नित्यानी इंग्रजाचे बाहेर निघण्याविसी तगादा करितों. त्यास उत्तर देतात की, सीखासी जुंज लागलें, आतां त्यांसी दबून सलूक करावा तर सलतनतेची आबरू रहात नाहीं, जर त्यासी सलूक न करावा तर तुह्मासी बोलत गेलों व श्रीमंतांस लिहीत गेलों या गोष्टींत अप्रामाणिकता येते, या अर्थी राहिली साहिली हुजूरची फौज तेही सिखावर पाठवून सदहदपर्यंत मुलूख हस्तगत करून तिकडील खात्रजमा जाली ह्मणजे पातशाहासहीत अंतरवेदींत उतरतो. ह्मणून धातुपोषणाच्या गोष्टी मात्र बोलून आमचें समाधान करितात. परंतु अमलांत येईल तेव्हां खरे. वरकड मार पुरवणीपत्रावरून श्रुत होईल. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries