मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ६४.

१६८५ वैशाख शुद्ध ११.

पु।। राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
उपरी. राजश्री मल्हारजी होळकर यांनी चौथाई सरंजाम सरकारांत द्यावा असा करारवचन तीर्थरूपांजवळ केले असतां, आता वैजापूर रांवेर मात्र देऊं ह्मणतात ही गोष्ट अपूर्व आहे ! सर्वांनी केल्या कराराप्रों द्यावें आणि यानीं कां न द्यावे ? तुह्मी करार केला असतां कां देत नाहीं, वचन तुह्मी केलें तें कोठें राहिलें ? असें त्यांचें आंगी लाऊन बोलल्यास कार्य होईलसें आहे. तर तुह्मी तीर्थरूपास विनंति करून, त्यास कायल करून, चौथाई सरंजाम कराराप्रों सरकारांत येई ती गोष्ट करणें. यावेसी तीर्थरूपास विनंति लिहिली आहे. तुह्मी वरचेवर स्मरण देऊन कार्य करून घेणें. जाणिजे. छ १० सवाल. सुहूरसन अर्बा सितैन मया व अलफ. मल्हारबाचा प्रकार प्रत्ययास आलाच आहे; परंतु जेथवर निकड होईल तितके करणें. छ मार.

(लेखनसीमा.)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries