मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ६५.

१६८५ श्रावण शुद्ध ९.

राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि:-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. पत्रीं लिहिलें कीं, अप्पाजी गणेशास ताकीद होऊन गोपाळरावाचे हवाली ठाणें हो तें करावें, ह्मणून संशय धरून लिहिलेंत व तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबांचे मनांत संशय आला आहे ह्मणून लिहिलें, तें कळलें. त्यास, तुह्मी वडिलास विनंति करून अप्पाजी गणेशास ठाणें न द्यावयाविसी आह्मीं पत्रें लिहिलीं असतील तीं पत्रें खामखा आणवणें. वडिलांचें चित्तांत संशय आणणारे आणतात. येथें तर वडिलाचे मर्जीसिवाय दुसरा अर्थच नाहीं. असें असतां, लहान माणूस वडिलाचें चित्तांत विपर्यास आणून देतात हें काय ? तरी हें पत्र वडिलास विदित करणें. या मजकुराविसी वडिलाची खातरजमा केलीच असेल. आह्मींच ल्याहावेसें काय आहे ? परंतु हें पत्र ल्याहावयाचें कारण हेंच कीं, इकडील मजकूर सविस्तर तुम्हांस ठाऊत असतां, चित्तांत संदेह आणून या गोष्टीचा अंदेसा न करतां पत्र लिहिलें याचें कारण कळलें नाहीं. परंतु असेंहि वाटतें कीं, वडिलांचे मर्जीचा भाव पाहून पत्र लिहिलें याचें कारण मात्र लिहून पाठवणें. जाणिजे. छ ७ सफर बहुत काय लिहिणें ? तेथील वृत्त कळावें म्हणून लिहिलें तें कळलें. तुम्हाविसी संदेह नाहीं. छ मजकूर.

(लेखनसीमा.)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries