मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ८०.

१६८८ वैशाख वद्य ३.

राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
उपरी मोरो नरहरी यांस जामीनाविसीं तगादा जाहाला आहे. त्यास, मारनिलेकडे गुंता नाहीं. तरी तीर्थरूपास विनंति करून सोडून देवणें. म्हणून तुम्हांस पूर्वी लिहिलेंच होते; परंतु त्यास अद्यापि सोडिलें नाहीं. जामीनाविसींच अटकाव असिलाच तर तुम्ही दरम्यान होऊन यांस सोडणें. कदाचित् यांजकडे मुद्दाच लागू जाला तरी याजपासून जाबसाल करून घेतला जाईल. हे मुलूख फोडून कोठें जाणार आहेत ? तरी तीर्थरूपाचा कागद देऊन सातारियास लाऊन देणें. हें पत्र कोणास न दाखविणें. लिहिल्याप्रों करून आपल्या जिम्मा करून घेणें. जाणिजे छ १७ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ?

(लेखनसीमा.)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries