मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

सदरहूप्रो दोन पत्रें भोलानाथ बिन                                           लेखांक २६.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १०.
सिद्धेश्वर शास्त्री यांजविषई दिल्हीं.
पत्रें कोन्हेर हरी आमील सरदार मुलूक-बहादूर यांणीं
मागितली त्याजवरून दिल्हीं छ ९ राखर.
गिरमाजी विठल निा धरमसिंग जाधव.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गिरमाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें विशेष बाबूराव पाटील मौजे अडगांवकर याचे गैरवाका सांगितल्यावरून मौजे मजकूर येथील नारायणजी पाटील यास मुलेंमाणसें सुद्धा तुह्मी धरून नेऊन कैद केलें मारहान नानाप्रकारें उपद्रव देतां ह्मणोन कळलें त्यास खांदार तालुकियांतील गावचे पाटलास धरून नेण्याची निसबत तुमची नसतां पाटील धरून नेऊन कैद करावयाचे कारण काय याउपरि पाटील मार यास बायेकामुले सुद्धा सोडून द्यावें येविषीचा फिरोन बोभाट येऊ न द्यावा रा छ ८ साखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries