मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१५१]                                                                        श्री.                                                             ४ सप्टेंबर १७५५.

श्रीमंत राजश्री बाबा स्वामीचे सेवेसी :- पोष्य गोविंद बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति त॥ भाद्रपद वद्य त्रयोदशी पावेतों आपले कृपे करून येथील वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील सविस्तर वर्तमान पेशजीचे पत्रीं लिहिलेंच आहे, त्याजवरून अवगत जालेंच असेल. आह्मी दिल्लीचे मुक्कामीहून श्रीमंत राजश्री दादास्वामीची आज्ञा घेऊन अंतरवेदींत आलों. याजउपर सत्वरींच देशास येतों. र॥ विठ्ठलराव यांणीं ग्वालियेरीस मोर्चे लाविले होते. त्याजवर किल्लेदारानें गोहदवाला राणा भीमसिंग जाट याजकडे अनुसंधान करून किल्ला त्यास द्यावासा केला. हजार दीड हजार स्वार व प्यादे पांच हजारानशीं भीमसिंग येऊन यांचे मोर्चे उधळून देऊन आपण किल्ल्यांत दाखला जाला. किल्ला भीमसिंगानें घेतला. जमियत करीत आहे. र॥ विठ्ठलराव दो कोशावर आहेत. भीमसिंगानें ग्वालियरच्या जागियांत दंगा करावयाचा विचार केला आहे. होईल वर्तमान तें लिहीत जाऊं भीमसिंगाचें पारपत्य होईल तरीच बंदोबस्त उत्तम आहे. सारांश, श्रीमंत र॥ दादास्वामी जाटावर आले, परंतु मन कोणी घालून, मेहनत करून त्याजला जेर न केलें. सुरजमल्ल जाट स्वामीस ठावका आहे. अपसांत चितशुध्द नाहीं. याजकरितां तो शेर जाला. श्रीमंत स्वामीचा बदनक्ष जाला. चार हजार घोडे, दोन हजार उंट, चार हजार बैल वाणियाचा सुरजमल्लानें नेला. असा बदनक्ष कधींही न जाला. असो. जर श्रीमंत राजश्री यजमान स्वामी, श्रीमंत राजश्री भाऊस्वामी येतात तर नक्ष होतो. पातशा वजीर श्रीमंत आलियावर समागमें दोन हजार तोफ घेऊन येतील. दोन महिनेयांत जाट फडशा होईल. करोड रुपयेयांचा मुलुख सुटेल. आह्मीच देशास येतों. भेटीनंतर साद्यंत विदित करून. वरकड चिरंजीव बाबूराव याजला लिहिलें आहे ते विनंती करतील. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ करीत जावा हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries