मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

येथेंही स्वस्थ नाहीह. गयेकडेही हरिभक्तांची नित्य हूल पडत्ये. चहूंकडे उपद्रव आहे. यानंतर येथील हिशेबाचा चिठा पाठविला आहे त्यावरून कळेल. सवदा करावयाचें सांगितलें होतें, त्यास मी आल्यपासून उपद्रव आहे, याजकरितां बनत नाहीं. येथेंही स्थिरता दिसत नाहीं. पहावे. यानंतर, परभू, ब्राह्मण कऱ्हाडे यांनी दहाजणांही प्रायश्चित्तें केली. रहातां पटवर्धन चार, वझे तिघे, ऐसे दहापांच राहिले आहेत. मोठे उत्पात करितेत. तेथून आलियापासून आह्मांवरच कमरबंदी केली होती; परंतु फजीत वरचेवर होतेत. परंतु लज्जा सोडिली. निर्लज्य झाले आहेत. पठाणाचे सांगातें वकीलाचा गुमास्ता सिवरामपंत आहे, त्यांकडे मनुष्य पाठविले होते. त्यांचें पत्रही आज आलें. जे कोतवालास परवाणा तयार जाहला, मोहोर उदईककरून पाठवितो. त्यास आज उदईक परवाणाही येईल. दक्षिणी ब्राह्मण आहेत त्यांस बाळकृष्ण दीक्षित तेथें आहेत, त्यांची खातरदास्त करून ते सांगतील त्याप्रमाणें करणें. फिरून त्यांनी नालीश नये. त्यांचे रजावंदीचें पत्र पाठवून देणें, ऐसे पत्र आलें. बापूजी महादेवाकडे पत्रें गेली आहेत. पातशाहाची परवाणे नवाब पठाणास येतील. वडिलांचे पुण्येंकरून उत्तमच होईल. वरकड होईल तें मागाहून पाठवून देऊं. गयेस खर्च हजार दीड हजार लागेल. कळलें पाहिजे. काशींत कांही बरें होईल हें दिसत नाहीं. लोकांस उपद्रवच आहे. प्रयागी अमदखान पठाण, नवाब यासी ह्मणताती, त्याचे भेटीस राजा बळवंतसिंग गेला. भेटी जाली. द्रव्य मुलुकाचा कबूल केला. राजे यासी सिरपाव दिला. कोतवाल मात्र काशीत नवाब अमदखान बागस याचा. बाकी सर्व राजा बळवडसिंग याजकडे पाहावें. होईल तें लिहून पाठवून देऊं. मलठणकर वैद्य स्त्री ३२०१ व वासुदेव भट मुने कऱ्हाडे यांस रु॥ ४० देविले ते दिले, कळले पाहिजे. मी आजीच गयेस गेलों. र॥ बाबाजवळी कोणी नाहीं. धामधुमी तिकडे आहे. अभयतां जालियावर श्रीत येऊं. कळलें पाहिजे. मिती फाल्गुन ११ शनिवार. हे विनंति. श्रीत पठाणाचा अम्मल जाला.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries