मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

त्यांचे रुपये जमा होते ते सर्वांस दिल्हे. आणखी जबाब घेऊन एकंदर लिहून घेऊन पाठविले आहेत. गोविंदभट वझ्यांचें मात्र राहिलें आहे. व शंकर दीक्षित पटवर्धन यांचे दोहों वर्षांचे रुपये शंभर त्यांस तेथेंच देऊन जबाब घेऊन तुह्मीं त्यांस दिले असतील ते वळवून घेणें. व प्राणनाथभट गाडगीळ यांस तीनशें रुपये आहेत. त्यांस त्या उभयतांचा शोध नाहीं. त्यांचे स्त्रियेस दोनशें रुपये दिले. त्यांची मातुश्री भिन्न आहे. ती समक्ष येथें नाहीं. याजकरितां शंभर रुपये ठेविले आहेत. तर यजमानास पुसोन तिजला देववितील तर देऊं. अथवा त्यांचे स्त्रीसच द्या ह्मणाले तर देऊं. यानंतर यादवरावाकडे तगादापत्रें पाठवितों, परंतु धामधूम प्रयागीं होती. रुपये आले नाहींत. तगादा करितों आले ह्मणजे लिहोन पाठऊं. घरींच दशाश्चमेधी ब्राह्मणभोजन यथास्थित चालतें. घरीं शें सवाशें होतें. छत्रामध्यें चार पांचशें व सन्यासी चाळीस तीसपर्यंत होते. अन्न सवंग आहे. तांदूळ बारीक उत्तम, चहूं पासऱ्यांपासून सा पासऱ्यांपर्यंत मोठे तांदूळ मण सवामण. गहूं अकरा पासरी रुपयाचे. चणे बारा पासरी रुपयाचे. दाळ दीड मण. जब दोन मण. तूप तीन शेर. साखर चिनी पक्की आठा रुपयां मण. तांबडी दोहों रुपयांपर्यंत मण. खुर्दा तेवीस टक्के. हा भाव आहे. गाजीपूर, जमुनी यामध्यें पठाण होते. त्यास राजबलबंड सिंहांशी लढाई जाहली. पायउतारा होऊन लढले. भोजपुरे सुधरसहा पठाणांकडे होता त्यास मारिलें. राजाचा जय जाहला. ते लुटून घेतले, कांहीं पळाले. गाजीपुरांत याचा अंमल जाला. यानंतर सुरतेध्यें सुभ्यांशीं व किल्लेदाराशीं झगडा जाहला. किल्लेदारानें गनीमास बोलावून शहरावर मार गोळयांचा केला. तेणेंकरून घरें बहुत जळालीं. माल बहुत जळाला. हीं काल सुरतेंची लिहिलीं सावकारांच्या घरीं आलीं. चहूंकडे धूम आहे. सवद्याविषयीं केशवास सांगितलें होतें. त्यास काशी शिक्का पंधरा रुपयांनीं दिल्लीचा तर मिळतच नाहीं. पहातों. तलाशामध्यें आहों. इ० इ० इ० हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries