मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ६१ ]

पु॥ ११४ श्री. १६१३.

राजश्री सखोबा स्वामींसः-- विनंति उपरि. गांवचे वाणी सारे येथें आले. गुजर बाहेर काढणें ह्मणून फारच आग्रह केला; आणि पूर्वीचा करारहि आहे. त्यांस गुजरास बाहेर काढणें ह्मणून चिटी दिली. त्यास, त्यानें दोन महिने पावेतों राहावें; उधार केला आहे ते उगवावा; दुकान अथवा नवा उदीम करूं नये. दो महिन्यानंतरी गांवांतून बाहेर काढणें. यांत गुंता नाहीं. तूर्त प्रज्यनाचे ( पावसाचे ) दिवस आहेत. यास्तव समजूत काढणें. येथवर बोभाटा दोघांचा न ये तें करणें. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries