मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

२ शिंदे याचे पलटणांत फराशीस बहुत आहेत. टिपूशीं मसलत याकरतां हा आंदेशा आहे. हिंदुस्थान दूर असतें तर चिंता नव्हती. नबाबाचे सरकारांत फराशीस होते, त्याची जेमत नबाबानी आपले आकत्यारांत आणून त्यास काढून दिलें तेंही आपला निभाव न लागे याजकरतां कंपनीचे सरकाराशीं सफाईकरून त्याचे फौजेंत राहिले. यावें उत्तर नानाचें आलें कीं शिंदे याचे खानगीचे तरतुदींत आहों.

३ कर्णेल बोललें कीं टिपूकडे श्रीमंताची पत्रें जाण्याचा शशीक भारी आहे. असें कलम त्यांतून व चिमपटणाहून बातमी आली. बहुशा वकील गेला असेल यावरून संशम आमचे मनांत आहे. नानानीं उत्तर केलें कीं श्रीमंतास विचारून सांगूं.
-----


१ जनरल कलकत्तेकर याचे पत्र पेशवेसरकारांत छ. २२ जमादीला आलें त्यांत मजकूर. आमचें पत्राचें जाबांत मजकूर हा कीं टिपूसुलतान याशीं तिन्ही शीरक सरकारांतून करार आले. त्यांत खुलष नसतां सुलतान मवसुफाकडून हारकत नाहीं. रात आली ताजुक आहे. रयतेची आबादी व मुलखाची नीगा हावजी मजूर खातर असे. सुलतान महसुब यास पत्र लिहिण्याची तदबीद व हारीफाचे गैरेचालीस हुशारी व निगाहाबजी मुनसब टिपूसुलतान याणीं करारांत खलष आणिल्यास तिनी सरकारांत द्यावें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries