मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति, उपरि. सेनासाहेब सुभा यांचीं पत्रें नागपुरीहून सरकारांत आलों कीं बाबुराव वैद्य व श्रीधरपंत व कुशाबा चिटणीस यांची रवानगी आपणाकडे करतों. बाबुराव यांस परवानगी पत्र यावें. ऐशीं पत्रें आलीं. त्यावरून बाबुराव यांस पत्र सरकारचें जावें असें ठरलें, त्रिवर्गही येणार. सत्वर येतील ह्मणोन लि।। तें कळलें. त्यास मध्यस्थानीं भोंसले प्रकर्णी मार केला कीं भवानी काळो, कुशाबा, श्रीधरपंत तिघांतून येकास आणवावें; आणि जाबसाल उलगडावे. याचा त। म॥र श्रीमंताचे पत्रीं लि।। आहे, त्यावरून तुम्हांस समजेल. बाबुराव आदिकरून त्रिवर्गाचें येणें या संधीस पुणियास घडतें हें ही योग्य आहे. र॥ छ १६ मोहरम हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries