मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
विनंति, उपरि:----

१ तैमूरशा दुराणी याचा काळ जाला. पुत्र आहेत त्यांत कोणांत कोणी नाहीं ह्मणोन लिं, व बिजेसिंग मारवाडी यांस देवआज्ञा जाली. धाकटे पुत्रास मसनतीवर बसवावें असें त्यानें सांगितलें म्हणोन लि।, तें कळलें. त्यास बखेडा आहे! ज्याचे दैवीं असेल तो होईल. ........ .... कलम------
१ जुजयातीच्या फर्दा तयार करून श्रीमंतांनीं समक्ष भवति न भवति करून वाजबी निर्गळितार्थ ठराऊन रघोत्तमराव यांचे हवालीं आठफर्दा केल्या. याच्या नकला त्यांनीं करून घेऊन फर्दा माघा-या आल्या ह्मणजे परवांचे दिवसीं आपल्याकडे रवाना होतील, ह्मणोन छ ३ माहे मोहरमीं तुह्मीं लिं. त्यास आह्मी छ ९ मोहरमीं ऐकावयास मध्यस्तांनीं बोलाविल्या. वरून गेलों. ते वेळेस त्यांनीं मार केला कीं आठ फर्दा दफेच्या आपल्याकडे आल्यात कीं काय ? तेव्हां आह्मीं सांगितलें येणार, येका दोन दिवसां येतील. तेव्हां बो (ल) ले कीं रघोत्तमराव यांर्नी आठफर्दा पाठविल्या. त्यास मोहरमेचे दिवस गेल्यानंतर तुह्मीं फर्दा पाहव्या. ठराव करून सांगावे. तसें करावयास येईल. याप्रमाणें बो ( ल ) ले, तुह्मीं फर्दा परवां पाठवितों ऐसें लिहिलें. त्या अद्याप आल्या नाहींत, मध्यस्त मस्करीच्या स्वभावानें आह्मास ह्मणतात कीं तुह्मी सांगाल तसें करीन. त्यास तोडजोडीचा प्रकार जे समंई त्या वेळेस हें बोलणें नीट, आतां तो कांहीं प्रकार राहिला नाहीं. आतां जसें तेथून ठरून येईल तितकें बोलून हो अथवा नाहीं इतका समजावयाचा प्रकार असें दिसोन येतें. त्यास फर्दा खाना करावयास राजश्री नाना तुह्मांस सांगतील ते वेळेस तोडजोडीचाही कांहीं प्रकार सांगतात किंवा लि। याप्रमाणें व्हावे, तोडजोड नाहीं याचा निश्चये खुलासा कसा ? हे लिहून पाठवावें. या प्रकर्णी खोलून लिहिण्याविषंई आळस करूं नये. प्रसंगास तुह्मांकडून पत्रें येऊन आह्मांस केलें असें व्हावें. ही पुरवणी नानास दाखवावयाची नाहीं. तुह्मांस कळावें सबब लि॥ असे. उत्तर लौकर यावें. कलमः----
१ तुकोजी होळकर महेश्वरास आले. शरीर समाधान नहीं ह्मणोन लिहिल्यावरून कळलें. कलम----
१ पालखीचे दाल, सरंजाम पाठविले ते सरकारचे पालख्यांस लाऊन पाहिले, तो सरंजाम थोर होतो यास्तव परत केले; ते बाळाजीपंत सेंबेकरा. बरोबर पाठवितों ह्मणोन लिं तें कळलें. त्यास बाळाजीपंत पुण्यांत आले किंवा इकडे आले किंवा कांहीं कामगिरीस गेले हें कांहीं समजत नाहीं त्यांचें पत्रही आलीकडे येत नाहीं. प्रसंग कोणे प्रकारचे आणि त्यांची रवानगी तर होत नाहीं ! यास काय करावें ? ईश्वर इच्छा !
कलमें च्यार र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries