मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि. जुजयातच्या फर्दा आठ पाठविल्या. या प्रथम मध्यस्तास दाखवाव्या. नंतर दुसरे दिवसीं राजश्री बाबाराव यांस बोलाऊं पाठऊन आणवावें, आणि फर्दा दाखवाव्या. बोलावें की तुमची गांठ मध्यस्ताचे घरीं पडावी तेथें आह्मीं बोलतों. तुह्मींही बोलून सरकारलिहिल्याप्र॥ बोलून ठराव करावा, ऐसें त्यास घेऊन बोलणें व्हावें. ऐसी राजश्री नानाची आज्ञा, त्याजवरून लिहिलें असें. आपण ह्मणतील बाबाराव येथें असतां त्यांचें बोलणें कीं :- काये जाबसाल असतील ते मला समजाऊन दिल्यास मी मध्यस्तासीं बोलून सर्व उगरून देतों. यास्तव त्यांस घेऊन करावें ह्मणोन श्रीमंतांनीं आज्ञा केली कीं बोलण्याचा उपर कशास ठेवावा ? यास्तव घेऊन बोलावें, हा यांतील खुलासा ह्मणोन लि।।. त्यास फर्दा पावल्यानंतर ध्यमस्ताकडे गेलों. फर्दाही दाखविल्या. याच फर्दाच्या नकला रघोतमराव यांजकडून आल्या, त्या अक्षरशा पाहिल्या. त्यावरून पुर्त्या नेहननिषीन जाहल्या आहेत. याचे जवाबाचे पर्याय दो ती दिवसांनंतर तुह्मासीं सर्व बोलण्यांत येईल. बाबाराव यांजकडे सांगून पाठविलें होतें त्याचा मार आलाहिदा पुरवणी पत्रीं लिहिला आहे त्याजवरून कळेल. र॥ छ २९ मोहरम. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries