भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

लाकडाच्या अरण्याचा, समिधांचा व शेणकुटाचा उल्लेख वारंवार केलेला आढळतो. परंतु लोखंड व गार यांनी बनलेली जी चकमक तिने अग्नी सिद्ध करण्याचा उपदेश कोठेही केलेला नाही. याचा अर्थ इतकाच की आर्य वनचर अद्याप लोहयुगात येण्यास बराच अवकाश होता, फक्त ज्वालाग्राही लाकडे घर्षणाने पेटवून अग्नी सिद्ध करण्याची कला त्यांना नुकती कोठे सापडली. या युगाला दारुयुग म्हटले असता वावगे होणार नाही. चुडा व उल्का पेटवून रात्री उजेड करण्याचेही ह्या काली त्यांना ज्ञान झाले होते. उल्का ऊर्फ चुडांच्या उजेडाने शत्रूंनी गुहांतून लपवून ठेविलेल्या गाई शोधून काढल्याचे उल्लेख ऋग्वेदात येतात.
(१) तपूंष्यग्ने जुह्य पतंगानसंदितो विसृज विष्वगुत्काः (ऋग्वेद ३००-२).
(२) अस्माकमत्र पितरो मनुष्या अभि प्रसेदुर्ऋतमाशुषाणाः ।
अश्मव्रजाः सुदुघा वव्रे अंत रुदुस्त्रा आजन्नुषसो हुबानाः ।।१३।।
(३) ते मर्मृजत ददृवांसो अद्रिं तदेषामन्ये अमितो विवोचन् ।
पश्वयंत्रासो अभि कारमर्चन् विदंत ज्योति श्चकृपंत धीभिः ।।१४।।
(ऋग्वेद सूक्त २९७)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries