मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १३१.

१६९७ माघ वद्य ६.

राजश्रि लक्ष्मण आबाजी गोसावी यांसी :-
सुाा सीत सबैन मया व अलफ. पाा. अंकलेश्वर येथील पाऊण लाख रुपये दरसाल इंग्रेजास द्यावे याप्रमाणें तहनाम्यांत करार असतां, मेस्तर राबट गंभीर याणीं परगणे मजकुरीं ठाणे घालून झाडून अंमल बंद केला आहे. त्याविसीं वारंवार तुह्मांस लिहिलें व गंभीरासही सांगितलें. परंतु अंमल सुटत नाहीं. जनरालाची परवानगी पाहिजे ह्मणतात. तहनाम्याखेरीज वर्तणूक करावयाविसीं जनरालानी यास सांगितलें असें नाहीं. पावणेदोन लक्षांचा महाल बळावून बसले आहेत. त्यास, तुह्मीं जनरालासी बोलोन माहाल सरकारचा सरकारांत घ्यावयाविसी पत्र जनरालाचें गंभीरास पाठविणें. अगर सध्यां माहाल द्यावयाचा अनमान असला, तरी लाख रुपये तऱ्हीं परगणे मजकूरचे सरकारांत द्यावे. येथें खर्चाची वोढ. कोठून ऐवज मिळावयास जागा नाहीं. फौज पोटावांचून हैराण आहे. दोन्हीं प्रकारांतून कोणता तो करून घेणें. माहाल सरकारांत द्यावा, पाऊण लाख रुपये घेत जावे; अथवा लाख रुपये सरकारांत सध्या सालमजकूरचे द्यावे. पुढे कराराप्रमाणें अंमलात येईल. व शहर सुरत येथील चौथाईची बाकी सनवातची मोगलाकडे राहिली होती. त्यास, मेस्तर गंभीराचे मुर्वतीमुळें निम्मेसिम्में सोड देऊन ऐवज पेशजी घेतला. हालीं सालमजकूरचा ऐवज वाजवी यावा त्यास सुरतकर मोगल निम्मे ऐवज देतो आणि चौथाईचा दरोबस्त ऐवज पावला ह्मणून कबज द्यावे ह्मणतो. गंभीरानी पान ९९ ताकीद करावी ते करीत नाहीं. याजकरितां हाही मजकूर जनरालास समजावून एविसीं मोंगलास व गंभीरास पत्र पाठविले कीं, वाजवी चौथाईचा ऐवज कराराप्रमाणें देणें. येणेंप्रमाणें पत्रें पाठवून ऐवज पावेसा करणें. चहूंकडून नाना प्रकारचे लडेलटके प्राप्त होतात. बाहेरील मोगलाचा अंमल बंद करावा तरी गंभीर वाईट मानितील. काय लिहितील नकळे. येथें तों मसलतीचे लांबणीमुळें वोढ पडली ते लिहिता पुरवत नाहीं. ज्याचा भरवसा त्याजकडूनच विक्षेप होतो. उपाय नाहीं ! हें सर्व जनरालांनी चित्तांत आणून सुधरावें हें उचित आहे. सर्व भरंवसा त्यांचा आहे, ऐसें बोलणें. तुमची पत्रें माघ शुद्ध शष्ठीची पावली. त्यांची उत्तरे मागाहून समजोन लेहून पाठवितों. जाणिजे. छ १९ जिल्हेज. बहुत काय लिहिणे ?

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries