मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १३३.

१६९७ फाल्गुन शुद्ध ८.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी गो। यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. एक दोन पत्रें तुचीं आलीं, त्यांत जनरालाचें बोलण्याची खातरजमा लिहिली. आठ पंधरा दिवसांत लढाई सुरू व्हावयाचें होईल, ह्मणून विनंति लिहिली होती. त्यास, येथें पत्रें पाऊन पंधरा रोज जाले. अद्यापि कांहीं दृष्टोत्पत्तीस येत नाहीं. प्रथम दिवस दिसतो. तापीतीरास तीन महिने एक जागा मुक्काम जाले. वैरणफांटें मिळावयाचें संकट. फौजेस रोजमरा नाहीं. पोटाचा गवगवा. लोकांनीं काय करावें ? पोटास तों पाहिजे ? त्याचे श्रम कोठपर्यंत पहावें ? तुमचे लिहिल्याचे तकव्यावरी पंधरा दिवस लोकांस उमेद होती. खर्चास असते, तरी चार दिवस अधिक उणे लागते तरी निभावलें जातें. याजकरितां हे प्रकार युक्तीनें जनरालासीं बोलून, सत्वर येथून कूच होय तें करणें. खानदेशांत गेलियानंतर, चार दिवस मुक्काम तेथें पडले तऱ्ही कामास पडतील. घोड्या माणसांत बाकी राहिली नाहीं. घोडी खराब जाहलियाउपरी लढाईच्या उपयोगी तऱ्ही काय पडतील ? इत्यादि प्रकार सुचऊन जलदी होय तें करणें. हैदर-नाईकाचे ऐवजीं जनरालानीं रुपये देविले आहेत, म्हणून कारनेल यांनीं विनंति केली. सुरतेस राउत पाठवावें, म्हणून सांगितलें. त्यावरून तेथें राउत पाठविलें. अैशीं हजार रुपये गंभीरांनीं द्यावे. त्यास, रुपये नाहींत, पंधरा रोजी पन्नास हजार देऊं, याप्रमाणें म्हणतात. येथें तों मोठें संकट, आजीचा दिवस गेला, प्रात:कालीं काय करावें, ऐसें प्राप्त आहे. गंभीर सरकारचे कामास नानाप्रकारें वोढितो. अलाहिदा पुरवणी-पत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. जाणिजे. छ ६ मोहरम. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries