मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १३३. (२)

१६९७ फाल्गुन शुद्ध ८.

पुाा राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोा यांसी :-
सुाा सीत सबैन मया व अलफ. जाबीतजंग हरि बल्लाळ यास सामील जाले. परंतु नगर व अशेरी दोन किल्ले द्यावयास फुतुरियांनीं कबूल केले आहेत ते द्यावे, ऐसें जाबीतजंग ह्मणतात. हरि बल्लाळ ह्मणतात कीं, एक लढाई मारा, त्यानंतर किल्ले देऊं. याप्रों दोघांची अट पडोन जाबीतजंग दोन कोस रुसोन मागे फिरले, असें वर्तमान आलें आहे. दुसरें : जाबीतजंगाचें बोलणें सारे फौजेनें माझें आराब्याचे आंत रहावें. फितुरी तें ऐकत नाहीं. हेही बातमी आली. जनरालास सांगावीसें असलियास सांगणें. जाणिजे. छ ६ मोहरम. बहुत काय लिहिणें? बारभाईकडील बातमी लिहिली आहे. परंतु बाजार आवाई आहे. जाणिजे. छ मजकूर.

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries